नाशिक: कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरले आहेत. मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईन वरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक रखडली आहे. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही. लोकल वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला नाही.
कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना ५०० मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
कसारा आणि इगतपुरी दरम्यान घाटात मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. TGR 3 जवळ मुख्य मधल्या मार्गिकेवर मालगाडीचे डबे घसरल्याने डाऊन लाईनवरील म्हणजेच नाशिक दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे रखडली आहे. रेल्वे रुळावरुन मालगाडीचे डब्बे बाजूला करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.
मालगाडीचे डबे रुळावरुन बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याojcस खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कल्याण येथून एक्सीडेंट रिलीफ ट्रेन पाठवण्यात आली आहे. तोपर्यंत मुंबईवरून नाशिक दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.सी एस एम टी हावडा आणि सी एस एम टी आदिलाबाद, नंदीग्राम एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम नाही, लोकल वाहतुकीवर देखील याचा कोणताही परिणाम नाही.