मुंबई: दुबईत सुरू असलेल्या अंडर १९ आशिया चषकात(u19 asia cup) भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा युवा संघ पाकिस्तानकडून ८ विकेटनी पराभूत झाला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या संघाने केवळ दोन विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. पाकिस्तानसाठी मोहम्मद जीशानने धारदार गोलंदाजी केली आणि अजान अवैसने शानदार शतक ठोकले.
ग्रुप एमधील या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीची जोडीची सुरूवात संथ आणि सावध झाली. ९व्या ओव्हरमध्ये ३९ धावांवर भारताला पहिला झटका बसला. अशिन कुलकर्णीला २४ धावांवर अमीन हसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रुद्र पटेलही १ धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद जीशानने बाद केले.
आदर्श सिंह आणि कर्णधार उदय शरणने तिसऱ्या विकेटसाठी १२० बॉलमध्ये ९३ धावा केल्या. भारतीय संघ यावेळी चांगल्या स्थितीत होता. मात्र आदर्श सिंह ६२ धावांवर परतला. त्यानंतर एकामागोमाग विकेट पडत गेले.
यानंतर कर्णधार उदय शरणने सचिन धाससोबत मिळून ४८ धावा करताना संघाला २०० पार पोहोचवले. एकूण २०६ धावा झाल्या असताना तो ६० धावा करू बाग झाला. दुसऱ्या बाजूने विकेट पडतच होत्या. मुरूगन अभिषेकने ४ तर राज लिंबानीने ७ धावा केल्या. भारतीय संघाला ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद जीशानने १० षटकांत ४६ धावा देत ४ विकेट मिळवल्या.
२६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. २८ धावांवर पाकिस्तानचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी झाली. त्यानंतर १३८ धावांवर त्यांची दुसरी विकेट पडली. मात्र त्यानंतर अजानने कर्णधार साद बैगसोबत १२५ धावांची नाबाद भागीदारी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…