Chhattisgarh Accident : लग्न करुन परतत असतानाच झाला अपघात; नवरा नवरीसह पाचजण ठार

आरोपी ट्रकचालक झाला पसार...


रायपूर : छत्त्तीसगडमध्ये नव्या संसाराची स्वप्न पाहणार्‍या एका जोडप्यासह तीन नातेवाईकांचा भीषण अपघातात (Chhattisgarh Accident) अंत झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक (Truck-Car Accident) दिल्याने हा अपघात झाला. अपघातात नववधू-नवरदेवासह (Bride-Groom) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून बालोदा येथे परतत होती. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना भरधाव ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली.


उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढून जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं काल रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते. परंतु अपघातात नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.



Comments
Add Comment

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा