Chhattisgarh Accident : लग्न करुन परतत असतानाच झाला अपघात; नवरा नवरीसह पाचजण ठार

आरोपी ट्रकचालक झाला पसार...


रायपूर : छत्त्तीसगडमध्ये नव्या संसाराची स्वप्न पाहणार्‍या एका जोडप्यासह तीन नातेवाईकांचा भीषण अपघातात (Chhattisgarh Accident) अंत झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक (Truck-Car Accident) दिल्याने हा अपघात झाला. अपघातात नववधू-नवरदेवासह (Bride-Groom) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून बालोदा येथे परतत होती. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना भरधाव ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली.


उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढून जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं काल रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते. परंतु अपघातात नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.



Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,