Chhattisgarh Accident : लग्न करुन परतत असतानाच झाला अपघात; नवरा नवरीसह पाचजण ठार

आरोपी ट्रकचालक झाला पसार...


रायपूर : छत्त्तीसगडमध्ये नव्या संसाराची स्वप्न पाहणार्‍या एका जोडप्यासह तीन नातेवाईकांचा भीषण अपघातात (Chhattisgarh Accident) अंत झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक (Truck-Car Accident) दिल्याने हा अपघात झाला. अपघातात नववधू-नवरदेवासह (Bride-Groom) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.


छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. वऱ्हाडी मंडळीची कार लग्नाहून बालोदा येथे परतत होती. ही गाडी रामगडहून अकलतराच्या दिशेने निघाली असताना भरधाव ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. पकरिया जंगल परिसरात ही दुर्घटना घडली.


उपस्थितांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार बाहेर काढून जखमींना रामगड आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी ट्रकचालकाने पळ काढल्याची माहिती आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


बालोदा येथील शुभम सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचं काल रात्रीच लग्न झालं. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता. कारमध्ये वधू-वरासोबत कुटुंबातील आणखी तीन सदस्य होते. परंतु अपघातात नवरी आणि नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.



Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक