Nitesh Rane : आदित्य ठाकरेंना अटक करून तपास करावा

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : दिशा सालियन यांनी आत्महत्या केल्याचे कुणी बोलत आहे, तर कुणी अपघात म्हणत आहे, पण आम्ही ही हत्या असल्याचे म्हणत आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची जेव्हा चौकशी सुरू होईल तेव्हा आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) अटक करून चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विश्वास व्यक्त केला आहे.


खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या नैतिकतेविषयी संजय राऊत सारख्या खिचडी चोराचा आरोप असलेल्यांच्या सल्ल्याची गरज नाही, असा हल्लाबोल राणे यांनी केला.


भाजपाकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे विधान राऊत यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.


आ. नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेचे ऑडिट कुणी करावे याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राऊत वाटेल ते बोलत आहेत. जनतेने भाजपाला मतदानाच्या रुपात आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे भाजपा खासदारांची संख्या २ खासदारांवरून ३०० वर पोहचली आहे. तर ठाकरे गटाची संख्या ५६ आमदारांवरून १५ वर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरचे महापौर ते आजपर्यंतच्या प्रवासाविषयी जनतेने ऑडिट केले आहे, त्यामुळे आम्हाला खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही.


त्याचप्रमाणे हिंदुत्वाचे ऑडिट राऊत करू शकत नाहीत. कधीतरी तुमच्या कुटुंबात तुमचे काय स्थान आहे? याचेही ऑडिट करा, असेही राणे म्हणाले. ज्या कुटुंबाचे पोट कोविड खिचडी घोटाळ्यावर भरते, त्याचे ऑडिट करावे. हॉटेल हयातचे बिल कोण भरते? याबद्दलही राणे यांनी ठाकरेंवर ताशेरे ओढले. बातम्यांमध्ये राहण्यासाठी संजय राऊत काहीही बोलत असतात. २०१० ला निलेश चव्हाणने आत्महत्या केली असे दाखविण्यात आले. या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या दबाबाखाली ही आत्महत्या केली. याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी राणे यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्यावर एका महिलेवर गँगरेप तसेच मर्डर केल्याचा आरोप आहे. इकडे तुम्ही ऑडिटची भाषा बोलता, असा सवालही त्यांनी केला.


राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र बसवून उबाठाची सगळी लफडी बाहेर काढीन, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची सफाई केली असून, त्यांनी अजून सफाई केली, तर काहीच शिल्लक राहणार नाही, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार