Nitesh Rane : आदित्य ठाकरेंना अटक करून तपास करावा

  60

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई : दिशा सालियन यांनी आत्महत्या केल्याचे कुणी बोलत आहे, तर कुणी अपघात म्हणत आहे, पण आम्ही ही हत्या असल्याचे म्हणत आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची जेव्हा चौकशी सुरू होईल तेव्हा आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) अटक करून चौकशी केल्यास सत्य समोर येईल, असा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विश्वास व्यक्त केला आहे.


खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाच्या नैतिकतेविषयी संजय राऊत सारख्या खिचडी चोराचा आरोप असलेल्यांच्या सल्ल्याची गरज नाही, असा हल्लाबोल राणे यांनी केला.


भाजपाकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे विधान राऊत यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.


आ. नितेश राणे म्हणाले की, नैतिकतेचे ऑडिट कुणी करावे याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राऊत वाटेल ते बोलत आहेत. जनतेने भाजपाला मतदानाच्या रुपात आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे भाजपा खासदारांची संख्या २ खासदारांवरून ३०० वर पोहचली आहे. तर ठाकरे गटाची संख्या ५६ आमदारांवरून १५ वर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरचे महापौर ते आजपर्यंतच्या प्रवासाविषयी जनतेने ऑडिट केले आहे, त्यामुळे आम्हाला खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही.


त्याचप्रमाणे हिंदुत्वाचे ऑडिट राऊत करू शकत नाहीत. कधीतरी तुमच्या कुटुंबात तुमचे काय स्थान आहे? याचेही ऑडिट करा, असेही राणे म्हणाले. ज्या कुटुंबाचे पोट कोविड खिचडी घोटाळ्यावर भरते, त्याचे ऑडिट करावे. हॉटेल हयातचे बिल कोण भरते? याबद्दलही राणे यांनी ठाकरेंवर ताशेरे ओढले. बातम्यांमध्ये राहण्यासाठी संजय राऊत काहीही बोलत असतात. २०१० ला निलेश चव्हाणने आत्महत्या केली असे दाखविण्यात आले. या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या दबाबाखाली ही आत्महत्या केली. याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी राणे यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्यावर एका महिलेवर गँगरेप तसेच मर्डर केल्याचा आरोप आहे. इकडे तुम्ही ऑडिटची भाषा बोलता, असा सवालही त्यांनी केला.


राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकत्र बसवून उबाठाची सगळी लफडी बाहेर काढीन, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची सफाई केली असून, त्यांनी अजून सफाई केली, तर काहीच शिल्लक राहणार नाही, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना

राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून

Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात