Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट नव्हे तर तपासणी करुनच मागे घेणार...

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले लेखी उत्तर


नागपूर : काही महिन्यांपूर्वी जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) या गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) उपोषण करत असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जालना हे प्रचंड घडामोडींचं केंद्र बनलं होतं. अख्खा मराठा समाज या घटनेमुळे पेटून उठला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये (Maharashtra Assembly Winter Session 2023) लेखी उत्तर देत लाठीहल्ल्याच्या दिवशी घडलेल्या घटनेचा तपशील सादर केला.


मनोज जरांगे यांनी पहिले उपोषण मागे घेतले त्यावेळेस मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतरही जरांगे सातत्याने ही मागणी करत आहेत. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देत कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिला आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलीस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस सर्वाधिक जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झालं आहे. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं त्यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले गुन्हे हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत हे या लेखी उत्तरावरून स्पष्ट झालं आहे.


मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने २ जानेवारी पर्यंतची मुदत मागून घेतली आहे. मात्र, जरांगे वारंवार ही मुदत २४ डिसेंबरपर्यंतच असल्याचे सांगत होते. काल त्यांनी यात आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात सातत्याने वार पलटवार होत असतात. आज लाठीहल्ल्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेले देवेंद्र फडणवीस येत्या दिवसांत या सगळ्या प्रकरणावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)