Maratha Reservation : मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट नव्हे तर तपासणी करुनच मागे घेणार...

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले लेखी उत्तर


नागपूर : काही महिन्यांपूर्वी जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) या गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) उपोषण करत असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जालना हे प्रचंड घडामोडींचं केंद्र बनलं होतं. अख्खा मराठा समाज या घटनेमुळे पेटून उठला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये (Maharashtra Assembly Winter Session 2023) लेखी उत्तर देत लाठीहल्ल्याच्या दिवशी घडलेल्या घटनेचा तपशील सादर केला.


मनोज जरांगे यांनी पहिले उपोषण मागे घेतले त्यावेळेस मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी सरकारकडे मागणी केली होती. त्यानंतरही जरांगे सातत्याने ही मागणी करत आहेत. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देत कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिला आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलीस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस सर्वाधिक जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झालं आहे. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असं त्यांनी लेखी निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले गुन्हे हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत हे या लेखी उत्तरावरून स्पष्ट झालं आहे.


मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने २ जानेवारी पर्यंतची मुदत मागून घेतली आहे. मात्र, जरांगे वारंवार ही मुदत २४ डिसेंबरपर्यंतच असल्याचे सांगत होते. काल त्यांनी यात आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात सातत्याने वार पलटवार होत असतात. आज लाठीहल्ल्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेले देवेंद्र फडणवीस येत्या दिवसांत या सगळ्या प्रकरणावर काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली