Nawab Malik : नवाब मलिक अखेर सत्ताधार्‍यांच्या बाकावर!

विधीमंडळात स्पष्ट झाली भूमिका


नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Rashtravadi Congress Party) पाच महिन्यांपूर्वी फूट पडली तेव्हा अनेक आमदारांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ दिली तर काहीजण शरद पवारांच्या (Sharad Pawar) साथीला राहिले. या संपूर्ण उलथापालथीत राष्ट्रवादीचे विश्वासू नवाब मलिक (Nawab Malik) मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. ते बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना आपल्याला पाठिंबा द्यावा याकरता गळ घातली होती. मात्र, नवाब मलिकांची भूमिका अनेक दिवस स्पष्ट होत नव्हती.


ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र नवाब मलिकांनी यावर स्पष्टता दिली नव्हती.


आज नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यामध्ये नवाब मलिक सत्ताधार्‍यांच्या जागी शेवटच्या बाकावर बसलेले दिसले. म्हणजेच अखेर मलिकांनी अजितदादांच्या गटाला पाठिंबा दिला आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद