चालो नाचो! सलमानने ममता बॅनर्जींना नाचवले!

कोलकाता : कोलकाता (Kolkata) येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival) सुरू आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील उपस्थित राहिल्या होत्या. या चित्रपट महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यात सलमान खान, (Salman Khan) अनिल कपूर, (Anil Kapoor) महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.


कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सलमान खानने या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी 'बांग्लार माटी बांग्लार जल' हे गाणे गायले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ममता बॅनर्जी या सलमान खान आणि महेश भट्ट यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत अनिल कपूर, सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा देखील स्टेजवर दिसत आहेत. तर सौरव गांगुली देखील शेजारी टाळ्या वाजवताना दिसत आहे.





ममता बॅनर्जींचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात