Piyush Ranade Marriage : अरे हा किती लग्नं करणार? तिसर्‍या लग्नावर अभिनेता पीयुष रानडे झाला ट्रोल

पीयुषने सुरुची अडारकरसोबत बांधली तिसरी लग्नगाठ; पहिल्या दोन पत्नीही आहेत प्रसिद्ध अभिनेत्री...


मुंबई : लग्न करताना प्रचंड उत्साही होत सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज शेअर करणं आणि काही दिवसांतच जोडप्याची घटस्फोटाची बातमी येणं यात आता काही नवीन राहिलेलं नाही. किंबहुना अनेक कलाकार घटस्फोटानंतर दुसरा जोडीदारही लगेच निवडतात. अनेकजण या गोष्टीला पाठिंबा दर्शवत असले तरी दुसरीकडे अनेकजण त्यांना ट्रोलही करतात. पण ट्रोल करणार्‍यांकडे ही जोडपी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात.


हल्ली अनेक मराठी कलाकारही सर्रास घटस्फोट आणि पुन्हा लग्न करत आहेत. मराठी कलाकारांनी असं वागलेलं चाहत्यांना मात्र रुचत नाही. अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता पीयुष रानडे (Piyush Ranade) याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. पीयुषने सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) या मराठी अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न केलं आहे. या जोडप्याने आज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन (Social media) लग्नाचे फोटोज शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. यावर अनेक मराठी कलाकारांनी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, तर दुसरीकडे पीयुषला तिसर्‍या लग्नासाठी ट्रोल करण्यात आलं आहे.


नेटकर्‍यांनी कमेंट सेक्शनमध्ये 'अरे हा किती लग्नं करणार? हे तिसरं लग्न' असं म्हणत पीयुषला ट्रोल केलं आहे. तर एकाने 'हे लग्न तरी कृपया टिकव' असा सल्ला दिला आहे. दुसर्‍या एका युजरने सुरुचीला 'मॅम जरा विचार तरी करायचा होता', असा सल्ला दिला आहे.



कोण होत्या पीयुषच्या पहिल्या दोन पत्नी?


अभिनेता पीयुष रानडेने पहिल्यांदा २०१० साली शाल्मली टोळ्ये (Shalmali Tolye) या अभिनेत्रीसोबत विवाह केला होता. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने अभिनेत्री मयुरी वाघशी (Mayuri Wagh) लग्नगाठ बांधली. 'अस्मिता' मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती आणि काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास दोन वर्षे त्यांनी मालिकेत सोबत काम केले आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. पण हेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही.


पीयुष रानडेने आता सुरुची अडारकरसोबत विवाह केला आहे. पीयुष आणि सुरुचीने एकत्र ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत काम केले होते. या दरम्यानच त्यांचे सूत जुळले असल्याची शक्यता आहे. त्यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.





सुरुची देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. पेहचान या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर पीयुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत दिसत आहे.

Comments
Add Comment

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे

Crime News :सोलापूरातील धक्कादायक घटना;बहिनीच्या पतीलाच...हॅाटेलमध्ये जेवायला बोलवलं अन्

सोलापूर : बहिणीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेवून आपल्याच बहिणीच्या पतीला