अमित शहांचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल, नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनले नाहीतर आज असता भारताचा भाग

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनला आहे. अमित शाह म्हणाले, दोन मोठ्या चुका पंडित नेहरू पंतप्रधान असताना झाल्या त्याच्या कारणामुळे अनेक वर्षे काश्मीरला त्याचे परिणाम भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होती तेव्हा पंजाबचा भाग येताच सीझफायर केले आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा जन्म झाला.

काँग्रेस खासदारांनी व्यक्त केला आक्षेप


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू-काश्मीर पुर्नगठन विधेयक २०२३वरील चर्चेदरम्यान म्हणाले, जर सीझफायर तीन दिवस उशिराने झाले असते तर पाकिस्तान अधिकृत काश्मीर आज भारताचा भाग असता. संयुक्त राष्ट्रात हे प्रकरण नेण्यात आले जी एक मोठी चूक आहे . अमित शाह यांच्या विधानावर काँग्रेस खासदारांनी मोठा आक्षेप व्यक्त केला आणि त्यानंतर सदनात जोरदार हंगामा झाला.

 


काँग्रेस खासदारांनी केले वॉकआऊट


यावर अमित शाह म्हणाले जर राग व्यक्त करायचा असेल तर तो माझ्यावर नाही नेहरूंवर करा. यानंतर काँग्रेसचे सर्व खासदार वॉकआऊट झाले. अमित शाह म्हणाले, आधी जम्मूमध्ये ३७ होत्या, आता ४३ आहेत. काश्मीरमध्ये आधी ४६ होत्या आता ४७ आहे आणि पीओके मध्ये २४ जागा आरक्षित केल्या आहेत कारण pok आमचा आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा


गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, मला विश्वास आहे की २०२४मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्ते येणार आहे आणि मला आशा आहे की २०२६ पआर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना पूर्णपणे संपतील.
Comments
Add Comment

Delhi Airport : ATC सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर उड्डाणांना विलंब; प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) गुरुवारी

४१६ वर्षांत ४१६ वेळाच उघडले कार्तिकेयाचे मंदिर

ग्वालियर : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर, राज्यातील एकमेव भगवान कार्तिकेय स्वामी मंदिराचे दरवाजे अखेर मंगळवारी

राजस्थानमध्ये लग्नसराईत २५ हजार कोटींची उलाढाल!

जीएसटी कौन्सिलने वस्तूंवरील कर कमी केल्याचा थेट परिणाम जयपूर : लग्न म्हटलं की संगीताचे सुस्वर, सजवलेला मंडप,

अरे बाप रे! 'या' गावात ४० टक्के ग्रामस्थांकडे एकच किडनी

देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीचे रॅकेट उघडकीस अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु; पण सर्वांचेच मौन नवी दिल्ली :

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ४ नव्या 'वंदे भारत' ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसीतून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींचा 'जंगलराज'वरून थेट हल्ला

राजदचे १५ वर्ष म्हणजे 'अंधारयुग'!  अररिया : बिहारमध्ये मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय