अमित शहांचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल, नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनले नाहीतर आज असता भारताचा भाग

  66

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनला आहे. अमित शाह म्हणाले, दोन मोठ्या चुका पंडित नेहरू पंतप्रधान असताना झाल्या त्याच्या कारणामुळे अनेक वर्षे काश्मीरला त्याचे परिणाम भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होती तेव्हा पंजाबचा भाग येताच सीझफायर केले आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा जन्म झाला.

काँग्रेस खासदारांनी व्यक्त केला आक्षेप


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू-काश्मीर पुर्नगठन विधेयक २०२३वरील चर्चेदरम्यान म्हणाले, जर सीझफायर तीन दिवस उशिराने झाले असते तर पाकिस्तान अधिकृत काश्मीर आज भारताचा भाग असता. संयुक्त राष्ट्रात हे प्रकरण नेण्यात आले जी एक मोठी चूक आहे . अमित शाह यांच्या विधानावर काँग्रेस खासदारांनी मोठा आक्षेप व्यक्त केला आणि त्यानंतर सदनात जोरदार हंगामा झाला.

 


काँग्रेस खासदारांनी केले वॉकआऊट


यावर अमित शाह म्हणाले जर राग व्यक्त करायचा असेल तर तो माझ्यावर नाही नेहरूंवर करा. यानंतर काँग्रेसचे सर्व खासदार वॉकआऊट झाले. अमित शाह म्हणाले, आधी जम्मूमध्ये ३७ होत्या, आता ४३ आहेत. काश्मीरमध्ये आधी ४६ होत्या आता ४७ आहे आणि पीओके मध्ये २४ जागा आरक्षित केल्या आहेत कारण pok आमचा आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा


गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, मला विश्वास आहे की २०२४मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्ते येणार आहे आणि मला आशा आहे की २०२६ पआर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना पूर्णपणे संपतील.
Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके