Mizoram Election Result: मिझोरममधील १७४ उमेदवारांच्या नशिबाचा आज फैसला

नवी दिल्ली: चार राज्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणानंतर आता मिझोरम येथील मतमोजणी होणार आहे. याआधी मतमोजणी ३ डिसेंबरला होणार नाही. मात्र राजकीय पक्ष, एनजीओ, विद्यार्थी संघटना आणि चर्च यांच्या अपीलानंतर निवडणूक आयोगाने ही तारीख बदलत ४ डिसेबंर केली. कारण येथील ख्रिश्चन लोकांसाठी रविवारचा दिवस अतिशय खास असतो.


मिझोरममध्ये मतमोजणीसाठी सुरक्षा अतिशय चोख करण्यात आली आहे. यावेळेस मिझो नॅशनल फ्रंट, झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि काँग्रेस यांच्यात त्रिशंकू सामना होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण १८ महिलांसह १७४ उमेदवार मैदानात आहेत. मिझोरम विधानसभेसाठी सात नोव्हेंबरला मतदान पार पडले होते. राज्यातील ८.५७ लाख मतदारांपैकी ८० टक्क्यांहून अधिकांनी मतदान केले होते.


मिझोरममध्ये एनएनएफ, झेडपीएम आणि काँग्रेस यांनी ४०-४० जागा लढवल्या तर भाजपने १३ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. मिझोरममध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने चार जागा लढवल्या. याशिवाय १७ अपक्ष उमेदवारांचाही निकाल आज लागणार आहे.


कडक सुरक्षाव्यवस्थेत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. काही ठिकाणी मतदारांची संख्या कमी आहे केवळ दोन टप्प्यात मतमोजणी होईल. मात्र बऱ्याच ठिकाणी पाच टप्प्यात मतमोजणी होईल.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू