Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन गटांत गोळीबार, १३ जणांचा मृत्यू

  63

इंफाळ: मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या गोळीबारात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना सोमवारी दुपारी लीथू गावात घडली.


म्यानमारच्या दिशेने जाणाऱ्या या गटावर परिसरातील एका गटाने जोरदार हल्ला केला. घटनास्थळी सुरक्षादलाला १३ जणांचे मृतदेह सापडले. याची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की हे स्थानिक निवासी नव्हते अशी प्राथमिक माहिती आहे. तेंगनापौल जिल्हा म्यानमारच्या सीमेवरच आहे.



मणिपूर हिंसा


या वर्षी मे महिन्यात या राज्यात हिंसाचाराची आग पेटली होती. यानंतर हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आणि तब्बल १७५ लोकांचा जीव गेला. अधिकतर भागामध्ये आजही इंटरनेट बंद आहे. हिंसादरम्यान दोन महिलांसोबत झालेल्या अपमानजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी याची निंदा केली होती तसेच न्याय मिळेल असाही विश्वास दिला होता.


या हिंसाचाराशी संबंधित सीबीआय तपास करत आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहे. संसदेत असो वा निवडणूक रॅलीदरम्यान या हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात