मुंबई : क्रिकेट विश्वचषक २०२३ (Cricket World Cup 2023) च्या अंतिम सामन्यात भारताचा (India) पराभव करत ऑस्ट्रेलियाने (Australia) दणदणीत विजय मिळवला. यानंतर विजयी संघाने जल्लोष करत त्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले. मात्र, यातील मिचेल मार्श (Mitchell Marsh) या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूचा एक फोटो प्रचंड वादग्रस्त ठरला. या फोटोत तो विश्वचषकावर पाय ठेवून हातात बिअरची बाटली घेऊन बसला होता. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना त्याचा भयंकर राग आला होता. भारतीय खेळाडूंनीही या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
या घटनेला ११ दिवस उलटून गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मिचेलने या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेन रेडिओ नेटवर्कशी बोलताना त्याने सांगितले की, “साहजिकच त्या चित्रात कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मी याबद्दल फारसा विचार केला नाही. मी सोशल मीडियावर फारसे पाहिले नाही. होय, हे प्रकरण चिघळलं. जो भेटतो तो हेच सांगतो की प्रकरण खूप तापलं आहे. मात्र, आता त्यावरची चर्चा थांबली आहे. असं जरी असलं तरी त्या चित्रात वादग्रस्त असं काहीही नव्हतं.”
ऑस्ट्रेलियन सेन रेडिओ नेटवर्कवर निवेदकाने त्याला पुढे प्रश्न विचारला की, “ती कृती तू पुन्हा करशील का? त्यावर मार्श म्हणाला, “होय, मी पुन्हा तसेच करेन. मला नक्कीच आशा आहे की, सर्व क्रिकेट चाहते मला समजून घेतील. मी प्रामाणिकपणे सांगतो कारण, त्यात अपमानास्पद काहीही नव्हते. मी त्याचा तसा फारसा विचार केला नाही. मी फारसे सोशल मीडियाकडे पाहिलेही नाही. त्यात मला वाईट असं काहीही वाटत नव्हतं”, असं मत मिचेलने व्यक्त केलं आहे. मिचेलच्या या उद्दामपणावर क्रिकेटप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील ३ सामने झाले असून भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. तर तिसऱ्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर सामना जिंकला. आज म्हणजेच १ डिसेंबरला या टी-२० मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे बरेचसे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत कारण ते पुन्हा मायदेशी परतले आहेत. कांगारू संघ उर्वरित दोन सामन्यांमध्ये नव्या खेळाडूंसह उतरणार आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…