Central railway Megablock : कल्याण-अंबरनाथदरम्यान शनिवार-रविवारी मेगाब्लॉक

रात्री उशिरा आणि पहाटेच्या रेल्वेच्या वेळांवर होणार परिणाम


कर्जत : मध्य रेल्वेच्या (Central railway) उल्हासनगर (Ulhasnagar) स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ (Kalyan To Ambernath) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रात्रीचा विशेष वाहतूक ब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. शनिवार-रविवारी मध्य रात्री १.२० वाजल्यापासून ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत.


सीएसएमटी (CSMT) येथून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथून मध्य रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंत तर रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल कर्जतऐवजी ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटेल.


ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता सुटेल. तर ब्लॉकपूर्वीची खोपोली येथून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरिता पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून पहाटे ०३.४० वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन मार्गावर गाड्या थांबणार नाहीत.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे