Central railway Megablock : कल्याण-अंबरनाथदरम्यान शनिवार-रविवारी मेगाब्लॉक

रात्री उशिरा आणि पहाटेच्या रेल्वेच्या वेळांवर होणार परिणाम


कर्जत : मध्य रेल्वेच्या (Central railway) उल्हासनगर (Ulhasnagar) स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ (Kalyan To Ambernath) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रात्रीचा विशेष वाहतूक ब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. शनिवार-रविवारी मध्य रात्री १.२० वाजल्यापासून ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत.


सीएसएमटी (CSMT) येथून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथून मध्य रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंत तर रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल कर्जतऐवजी ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटेल.


ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता सुटेल. तर ब्लॉकपूर्वीची खोपोली येथून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरिता पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून पहाटे ०३.४० वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन मार्गावर गाड्या थांबणार नाहीत.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा, आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र; ६४८ कोटी १५ लक्ष ४१ हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता

६,१२,१७७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले

Navi Mumbai : कामोठे येथे सिलिंडर स्फोटानंतर घरात आग; दोघांचा होरपळून मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील कामोठे परिसरात एका घरात लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने