Marathi Boards : मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेचं आठ दिवसांचं अल्टिमेटम

सातारा : मनसेच्या (MNS) आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सर्व दुकानांना मराठी पाट्या (Marathi Boards) लावण्याचा आदेश दिला. यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र काही व्यापार्‍यांनी या आदेशाचे पालन न केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा दुकानांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अमराठी पाट्यांविरोधात मनसैनिकही आक्रमक झाले आहेत आणि याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. सातारा (Satara) येथे कराडमध्ये मनसैनिकांनी दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुकानांवर कारवाई करावी, असे निवेदन मनसेकडून तहसीलदारांना देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, सतीश यादव, नितीन महाडिक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ, केतन जाधव, शंभूराजे भिसे यांच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यावसायिक दुकानाला मराठीत पाटी लावत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना अद्याप इंग्रजीत पाट्या आहेत. प्रशासनाने अशा दुकानांचा सर्व्हे करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाट्या लावण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे