Telangana Election: ११९ जागा, २२९० उमेदवार, ३.२६ कोटी मतदार, तेलंगणामध्ये आज मतदान

  131

हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी(telangana assemble election) गुरूवारी मतदान होत आहे. तेलंगणा निवडणुकीसह या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक पूर्ण होतील. काही राजकीय तज्ञांनी या निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीआधीची सेमीफायनल असे म्हटले आहे.


तेलंगणाच्या आधी छत्तीसगड, मिझोरम, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठी मतदान पार पडले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. तेलंगणाचा मुख्य सामना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची पार्टी भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजप यांच्यात मानला जात आहे. दरम्यान, निवडणुकीआधी अनेक सर्वेमध्ये बीआरएस आणि काँग्रेसची टक्कर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ९ जागांवर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीआधी सर्व पक्षांच्या दिग्गजांनी जसे भाजपकडून नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून राहुल गांधी, बीआरएस प्रमुख केसीआर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी जोरदार प्रचार केला होता.


पीटीआयच्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये एकूण २२९० उमेदवार विधानसभा निवडणूक लढवत आहे. यात सीएम केसीआर, त्यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजपचे लोकसभा सदस्य बी संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे.


राज्यभरात ३५,६५५ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत येथे एकूण ३.२६ कोटी अधिकृत मतदार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १०६ निर्वाचन क्षेत्रात सकाळी सात वाजल्यापासून ते संघ्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होत आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )