या देशातील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय येऊ शकतात भारतात

नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही वाचले असेल की काही देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीय लोकांना व्हिसाची(visa) गरज नसते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशांचे लोक भारतात व्हिसाशिवाय येऊ शकतात. जर तुम्हाला हे माहीत नाही तर हैराण होण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या देशातील लोक व्हिसाशिवाय भारतात फिरू शकतात.



कोणते लोक व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतात


गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार केवण दोन देशांतील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय भारतात येऊ शकतात. या देशातल लोक जमिनीच्या रस्त्याने येऊ देत अथवा हवाई मार्गाने अथवा जहाजाने भारतात आले तरी त्यांना व्हिसा अथवा पासपोर्टची गरज आहे.


हे दोन्ही देश भारताच्या शेजारील देश आहे आणि या देशांसोबत अनेक दशकांपासून भारताचे संबंध चांगले आहेत. दरम्यान, या लोकांकडे व्हिसा अथवा पासपोर्ट जरी नसला तर त्यांच्याकडे आपल्या देशाचे नागरिकत्व सर्टिफिकेट अथवा मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. दरम्यान, काही स्थितींमध्ये तर या देशातील लोकांकडे व्हॅलिड पासपोर्ट असला तर भारतात एंट्रीही मिळते.



कोणत्या स्थितीत होते असे


गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, जेव्हा एखादी नेपाळची व्यक्ती अथवा भूतानची व्यक्ती चीन, मकाऊ, हाँगकाँग, पाकिस्तान अथवा मालदीव येथून भारतात येते तेव्हा त्यांच्याकडे आपल्या देशाचा व्हॅलिड पासपोर्ट असेल तर एंट्री मिळू शकते. तर जगातील ५७ देशांमध्ये भारतीय लोक व्हिसाशिवाय एंट्री करू शकतात.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१