नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही वाचले असेल की काही देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीय लोकांना व्हिसाची(visa) गरज नसते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशांचे लोक भारतात व्हिसाशिवाय येऊ शकतात. जर तुम्हाला हे माहीत नाही तर हैराण होण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या देशातील लोक व्हिसाशिवाय भारतात फिरू शकतात.
गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार केवण दोन देशांतील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय भारतात येऊ शकतात. या देशातल लोक जमिनीच्या रस्त्याने येऊ देत अथवा हवाई मार्गाने अथवा जहाजाने भारतात आले तरी त्यांना व्हिसा अथवा पासपोर्टची गरज आहे.
हे दोन्ही देश भारताच्या शेजारील देश आहे आणि या देशांसोबत अनेक दशकांपासून भारताचे संबंध चांगले आहेत. दरम्यान, या लोकांकडे व्हिसा अथवा पासपोर्ट जरी नसला तर त्यांच्याकडे आपल्या देशाचे नागरिकत्व सर्टिफिकेट अथवा मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. दरम्यान, काही स्थितींमध्ये तर या देशातील लोकांकडे व्हॅलिड पासपोर्ट असला तर भारतात एंट्रीही मिळते.
गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, जेव्हा एखादी नेपाळची व्यक्ती अथवा भूतानची व्यक्ती चीन, मकाऊ, हाँगकाँग, पाकिस्तान अथवा मालदीव येथून भारतात येते तेव्हा त्यांच्याकडे आपल्या देशाचा व्हॅलिड पासपोर्ट असेल तर एंट्री मिळू शकते. तर जगातील ५७ देशांमध्ये भारतीय लोक व्हिसाशिवाय एंट्री करू शकतात.
मुंबई: स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन २०२४च्या फायनलमध्ये नोवाक जोकोविचने हरवत दुसऱ्यांदा विम्बल्डनचा खिताब जिंकला आहे.…
मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना हरारेमध्ये…
मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाचवा टी-२० सामना भारताने ४२ धावांनी जिंकला आहे. टीम इंडियाने…
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्यांचे रविवारी सोशल…
वाहनांचा चक्काचूर तर ११ ते १२ जण जखमी नाशिक : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये…
गांधीनगर : पुण्यामध्ये (Pune) सध्या झिका व्हायरसने (Zika Virus) धुमाकूळ घातला असताना गुजरातमध्येही एका नव्या…