Marathi Boards : अमराठी पाट्यांविरोधात महापालिकेची धडक कारवाई

मराठी पाटी नसल्यास प्रति कामगार २००० रुपये दंड


मुंबई : मनसेने (MNS) अमराठी पाट्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला दुजोरा देत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Boards) लावण्यासाठी दुकानदारांना २५ नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटून गेल्यावरही काहीजणांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) अशा दुकानांवर धडक कारवाई सुरु केली आहे.


मुंबई महापालिकेचे कर्मचारी आज सकाळपासूनच सर्व दुकानांची पाहणी करत आहेत. कुलाबा परिसरातील नाईकी स्पोर्टस ब्रँडच्या आऊटलेटवर महापालिकेने कारवाई केल्याचे समोर आले आहे. मराठी पाट्या नसल्यास प्रति कामगार २००० रुपये दंड आकारणार, अशी माहिती आहे. आस्थापना टॅली प्रमाणपत्रावर (Establishment tally certificate) कामगारांचा जो आकडा असतो त्यानुसार दंड आकारला जातो, असं एका महापालिका अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.


मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर नवी मुंबईत मनसैनिक देखील आक्रमक झाले आहेत. पुढील दोन दिवसांत मराठी पाट्या लावा नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले आणि आंदोलन सुरु केलं. या मॉलमधील ज्या आस्थापनांवर मराठी पाट्या नाहीत त्यांना पुढील दोन दिवसांत त्या लावण्याचा निर्वाणीचा इशारा मनसेने दिला आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून