IND Vs AUS 3rd T20: गायकवाडचे नाबाद शतक, भारताचे ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचे आव्हान

  64

गुवाहाटी: भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने(ruturaj gaikwad) ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(IND Vs AUS) तिसऱ्या टी-२० सामन्यात २२२ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान दिले आहे.


भारतासाठी ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत नाबाद १२३ धावांची खेळी केल्या. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या या खेळीत १३ चौकार आणि ७ षटकार ठोकले. यासोबतच तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताने आपले दोन फलंदाज झटपट गमावले. यामुळे भारताच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र त्यानंतर आलेल्या ऋतुराज गायकवाडने जबरदस्त नाबाद १२३ धावांची खेळी केली. यामुळे संघाला दोनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठता आला.


सामना सुरू झाल्यानंतर सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.


त्याने ५७ चेंडूत तब्बल १३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची आतषबाजी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी