IND Vs AUS 3rd T20: गायकवाडचे नाबाद शतक, भारताचे ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचे आव्हान

  71

गुवाहाटी: भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने(ruturaj gaikwad) ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(IND Vs AUS) तिसऱ्या टी-२० सामन्यात २२२ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान दिले आहे.


भारतासाठी ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत नाबाद १२३ धावांची खेळी केल्या. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या या खेळीत १३ चौकार आणि ७ षटकार ठोकले. यासोबतच तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताने आपले दोन फलंदाज झटपट गमावले. यामुळे भारताच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र त्यानंतर आलेल्या ऋतुराज गायकवाडने जबरदस्त नाबाद १२३ धावांची खेळी केली. यामुळे संघाला दोनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठता आला.


सामना सुरू झाल्यानंतर सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.


त्याने ५७ चेंडूत तब्बल १३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची आतषबाजी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे