IND Vs AUS 3rd T20: गायकवाडचे नाबाद शतक, भारताचे ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचे आव्हान

गुवाहाटी: भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने(ruturaj gaikwad) ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(IND Vs AUS) तिसऱ्या टी-२० सामन्यात २२२ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान दिले आहे.


भारतासाठी ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत नाबाद १२३ धावांची खेळी केल्या. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या या खेळीत १३ चौकार आणि ७ षटकार ठोकले. यासोबतच तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताने आपले दोन फलंदाज झटपट गमावले. यामुळे भारताच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र त्यानंतर आलेल्या ऋतुराज गायकवाडने जबरदस्त नाबाद १२३ धावांची खेळी केली. यामुळे संघाला दोनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठता आला.


सामना सुरू झाल्यानंतर सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.


त्याने ५७ चेंडूत तब्बल १३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची आतषबाजी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर