Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजित पवार गटाचे विधीमंडळात २६० पानी तर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

आमदार अपात्रता प्रकरणी कोणाला मिळणार दिलासा?


मुंबई : सध्या विधीमंडळात शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtravadi Congress) या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटीबद्दल सुनावणी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, तर शिवसेनेबद्दलच्या निर्णयासाठी ३१ डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी मूळ आमचीच असा दावा अजित पवार गटाने केला आहे.


सरकारला साथ दिलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या पुढील सुनावणीसाठी विधीमंडळाने दीड-ते दोन महिन्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली. शरद पवार गटाच्या आमदारांनी नोटीसीला १० पानी उत्तर दिले आहे. तर अजित पवार गटाकडून २६० पानी उत्तर आलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा ठोकला होता. राष्ट्रवादी आमदारांचं बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावाही केला होता. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देखील आमच्यासोबत असल्यामुळे मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत निर्णय घेतला जावा. अध्यक्ष यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे कोणत्या गटाला दिलासा मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे

अंदमान निकोबारमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार  

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वी जयंती आहे. यंदा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा? - थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी शिंदे समितीकडे पाठवण्याच्या राज्य सरकारच्या सूचना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होणार- कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा

उद्योगांना उपयुक्त ठरणारी देशातील पहिली ' ए आय लिविंग लॅब' महाराष्ट्रात सुरु महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या दृष्टीने भाजपचे पहिले पाऊल

शालेय वस्तूंची जेम पोर्टलवरून करा, नाहीतर डिबिटी करा मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर

Versova-Madh passenger jetty: वर्सोवा-मढ प्रवासी जेट्टीचा चेहरामोहरा बदलणार

- मंत्री नितेश राणे यांनी दिले घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश मुंबई : वर्सोवा-मढ परिसरातील