Marathi Boards : कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलला मनसेचा दणका!

  160

मराठी पाट्या लावण्याची मुदत उलटून गेल्याने अमराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन


मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत (Marathi Boards) असाव्यात अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, या भूमिकेला काही अमराठी व्यापार्‍यांनी विरोध केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या व्यापार्‍यांना दणका देत २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत पाट्या लागल्याच पाहिजेत, असा निर्णय दिला होता.


यानंतर ही मुदत उलटूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठी पाट्या नसल्याचे चित्र आहे. यामुळेच मनसेने आठवडाभरापूर्वी 'पाट्या लागल्या नाहीत, तर मनसेचा खळखट्याक', असा मजकूर असलेले बॅनर्स लावत आक्रमक होण्याचा इशारा दिला. त्यानुसार कुर्ल्यातील एका मॉलमध्ये मराठी पाटी न लावल्याने मनसेने आंदोलन सुरु केलं आहे. फिनिक्स मार्केटसिटी मॉल (Phoenix marketcity Kurla) या ठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.


'सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला दोन महिने झाले आहेत. पण कुर्ल्यातील हा मॉल जाणुनबूजून आदेशाचे पालन करत नाही. मराठी भाषेचा ते सन्मान करत नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचा निषेध नोंदवायला आम्ही इथे आलो आहोत आणि आता आम्ही मॅनेजमेंटसोबत मनसे स्टाईलने चर्चा करु. जोपर्यंत ते मराठी पाटी लावणार नाहीत तोपर्यंत कोणालाच मॉलमध्ये जाऊ देणार नाही', अशी भूमिका मनसे पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २५ नोव्हेंबरलाच महाराष्ट्रात सर्वत्र मराठी पाट्या लावणे आवश्यक होते. अमराठी पाट्यांविरोधात आजच कारवाई सुरु होणार होती. मात्र, आज सुटीचा दिवस असल्यामुळे कारवाई उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेने आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. मॉलच्या आतमध्ये शिरुन व्यवस्थापकांना जाब विचारणार, असा निर्धार मनसैनिकांनी केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.