Marathi Boards : कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलला मनसेचा दणका!

मराठी पाट्या लावण्याची मुदत उलटून गेल्याने अमराठी पाट्यांविरोधात मनसेचं आंदोलन


मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत (Marathi Boards) असाव्यात अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, या भूमिकेला काही अमराठी व्यापार्‍यांनी विरोध केला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या व्यापार्‍यांना दणका देत २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत पाट्या लागल्याच पाहिजेत, असा निर्णय दिला होता.


यानंतर ही मुदत उलटूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठी पाट्या नसल्याचे चित्र आहे. यामुळेच मनसेने आठवडाभरापूर्वी 'पाट्या लागल्या नाहीत, तर मनसेचा खळखट्याक', असा मजकूर असलेले बॅनर्स लावत आक्रमक होण्याचा इशारा दिला. त्यानुसार कुर्ल्यातील एका मॉलमध्ये मराठी पाटी न लावल्याने मनसेने आंदोलन सुरु केलं आहे. फिनिक्स मार्केटसिटी मॉल (Phoenix marketcity Kurla) या ठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.


'सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला दोन महिने झाले आहेत. पण कुर्ल्यातील हा मॉल जाणुनबूजून आदेशाचे पालन करत नाही. मराठी भाषेचा ते सन्मान करत नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचा निषेध नोंदवायला आम्ही इथे आलो आहोत आणि आता आम्ही मॅनेजमेंटसोबत मनसे स्टाईलने चर्चा करु. जोपर्यंत ते मराठी पाटी लावणार नाहीत तोपर्यंत कोणालाच मॉलमध्ये जाऊ देणार नाही', अशी भूमिका मनसे पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २५ नोव्हेंबरलाच महाराष्ट्रात सर्वत्र मराठी पाट्या लावणे आवश्यक होते. अमराठी पाट्यांविरोधात आजच कारवाई सुरु होणार होती. मात्र, आज सुटीचा दिवस असल्यामुळे कारवाई उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेने आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. मॉलच्या आतमध्ये शिरुन व्यवस्थापकांना जाब विचारणार, असा निर्धार मनसैनिकांनी केला आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले

Amitabha bachchan Dharmendra : 'अन् निःशब्द शांतता...' धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपानंतर 'जय'ची हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे.

उत्तन - विरार सी लिंकचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत

- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत

कस्तुरबा रुग्णालयात उभारणार १३० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प

दरवर्षी ११ लाख रुपयांची होणार बचत मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने ऊर्जा बचतीच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकून