गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग,पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांची तारांबळ

पंचवटी (प्रतिनिधी)- गंगापूर धरणातून(gangapaur) जायकवाडी धरणासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत जवळपास ३१२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदाघाट परीसरासह पंचवटीत चांगलीच तारांबळ उडाली ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.


गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे गोदाघाट जलमय झाला होता. ऐन हिवाळ्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण व हवेत गारवा निर्माण झाला होता.


पंचवटी सह नाशिक शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊसाने चांगलीच हजेरी लावली. यांमुळे मुख्य बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेते यांची धावपळ पाहायला मिळाली. गोदा काठावरील विक्रेत्यांना विक्रीची दुकाने व वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.


पंचवटीतील, गोदाघाट, राम कुंड, भाजी बाजार, आडगाव नाका, मालेगांव स्टॅण्ड, येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. तसेच पंचवटीलगतच्या ग्रामीण भागातील मखमलाबाद, दरी, मातोरी, म्हसरुळ, आडगाव, नांदूर, मानूर या शिवारातील रब्बी हंगामाच्या पिकांसह द्राक्षाला या पावसाने फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.



नियोजनाचा फज्जा


अचानक झालेल्या पावसाने मनपाच्या रस्ते, खड्डे, पावसाळी गटार योजनेचा व नियोजनाचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. रस्त्यावर व खड्ड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून आले. व सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या व नवीन रस्त्याच्या डांबरीकरणाचे तीन तेरा वाजले. यातून मनपाच्या अनियमित नियोजनाचे दर्शन नागरिकांना झाले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये