ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर (Box Office) सुपरहिट कामगिरी केली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर धर्मवीर २ (Dharmaveer 2) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. आज या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसोहळा पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.
मुहूर्तसोहळ्याच्या वेळी आनंद दिघे यांच्या तसबिरीला वंदन करण्यात आलं आणि अंबेमातेची आरती करण्यात आली. यावेळेस अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak), सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि निर्माते मंगेश देसाई (Magesh Desai) उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करुन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली. ठाण्याच्या कोलशेत भागात आनंदाश्रमचा सेट उभारला आहे. तसेच कल्पतरु बिल्डरच्या जागेवरही या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये धर्मवीर २ या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.
पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत निर्माते मंगेश देसाई म्हणाले होते की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. दिघे साहेबांच्या काही गोष्टी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमात दाखवण्यात आल्या. पण तरी त्यांच्या अनेक गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा ‘हिंदुत्व’ होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ‘धर्मवीर २’ मध्ये दाखवण्यात येणार आहे’. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…