मुंबई शहराच्या बहुतांश भागात शनिवारी ढगाळ वातावरण राहिले. यामुळे गारठा कमी होता. पुढील दोन दिवस पावसासह गारपिठीची शक्यता कायम असून, हवामान विभागायाने उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऱ्यात वाढ होत असून, शनिवारी किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणातून गारवा गायब झाला होता.
अवकाळीची शक्यता यापूर्वीच हवामान विभागायाने वर्तविली होती. दिवसभर शहरात पाऊस झाला नाही. परंतु ढगाळ वातावरण राहिले. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिठीचीही शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार भागात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वातावरणातून गायब झालेला गारवा पुढील आठवड्यात पुन्हा परतणार आहे.
तसेच मुंबईच्या बराचश्या भागात रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसापासुन मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणात सुधारणा होण्यास यामुळे हातभार लागला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे मुंबईचे वातावरण देखील सुधारेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेचा आदेश मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे.…
मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्तेवाहतुकीसह…
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक…
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडले आहे. पुण्यात गस्त घालणा-या पोलिसांच्या…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या…
मुंबई : मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा…