मुंबई शहराच्या बहुतांश भागात शनिवारी ढगाळ वातावरण राहिले. यामुळे गारठा कमी होता. पुढील दोन दिवस पावसासह गारपिठीची शक्यता कायम असून, हवामान विभागायाने उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऱ्यात वाढ होत असून, शनिवारी किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणातून गारवा गायब झाला होता.
अवकाळीची शक्यता यापूर्वीच हवामान विभागायाने वर्तविली होती. दिवसभर शहरात पाऊस झाला नाही. परंतु ढगाळ वातावरण राहिले. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिठीचीही शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार भागात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वातावरणातून गायब झालेला गारवा पुढील आठवड्यात पुन्हा परतणार आहे.
तसेच मुंबईच्या बराचश्या भागात रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसापासुन मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणात सुधारणा होण्यास यामुळे हातभार लागला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे मुंबईचे वातावरण देखील सुधारेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…