Nitesh Rane: ऋषिकेश बेदरे हा प्यादा, तर दगडफेकीमागचे सुत्रधार कोण?

विरोधी पक्षाने आणि मनोज जरांगें-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची जाहीर माफी मागावी

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेत सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक करुन पोलीसांना लाठीचार्ज करण्यास भाग पाडणाऱ्या ऋषिकेश बेदरे-पाटील याला अटक करण्यात आली आहे. दगडफेक झाल्यानंतर दोनच दिवसांनी ऋषिकेश बेदरे ह्यांने शरद पवारांच्या भेटीला गेल्याचा फोटो पोस्ट केला होता. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली भूमिका मांडली.


नितेश राणे म्हणाले, जालन्यामध्ये झालेल्या दगडफेकीचा मास्टरमाईंड ऋषिकेश बेदरे दगडफेकींनंतर लगेचंच शरद पवारांच्या भेटीला जातो. त्यामुळे महाराष्ट्राला नेमकं कोण अशांत करण्याचा प्रयत्न करतयं याची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत. त्या दगडफेकींनंतर पोलीसांनी लाठीचार्ज का केला? कोणी आदेश दिले? यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरण्यात आले होते. आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आल्या त्याचबरोबर काड्या करण्याचे आरोप देखील करण्यात आले.



ऋषिकेश बेदरे-पाटील हा सामान्य कार्यकर्ता असुन त्याच्यामागे कोणी ताकद उभी केली? त्या दगडफेकीमागचे नेमके उद्दिष्ट काय? ही दगडफेक नेमकी कोणी करायला लावली? या सगळ्याची उत्तरे विरोधी पक्षाने आणि मनोज जरांगें-पाटलांनी द्यावी. आणि त्याच बरोबर सर्वांनी देवेंद्र फडणवीसांची जाहीर माफी मागावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व