Pune Mega Block : पुण्यात दोन दिवसांचा मेगाब्लॉक; मुंबई-पुणे प्रवासावर होणार परिणाम

जाणून घ्या कोणत्या गाड्यांमध्ये होणार बदल


पुणे : पुणे शहर परिसरातील रेल्वे (Pune Railway Block) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये उद्या शनिवारी, २५ नोव्हेंबर आणि रविवारी २६ नोव्हेंबरला रेल्वेमहामार्गावर विशेष मेगा ब्लॉक राहणार आहे. पुणे मार्गावरील खडकी ते शिवाजीनगर दरम्यान २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत नॉन इंटरलॉकिंगचे काम, मिलिटरी यार्डचे इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात (Timetable) बदल करण्यात आला आहे.


मेगा ब्लॉकमुळे पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत, काही गाड्यांची वेळ बदलली आहे, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रवाशांनी झालेल्या गैरसोयीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कृपया रेल्वे चौकशी यंत्रणेवर गाडीची सद्यस्थिती तपासून पहावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मेगाब्लॉक काळात पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन (Deccan Queen), सिंहगड एक्स्प्रेस (Sinhagad Express), इंटरसिटी (Intercity), कोयना (Koyna), डेक्कन एक्स्प्रेस (Deccan Express) या गाड्या रद्द झाल्या आहेत. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहींच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. तसेच पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत.

Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला