Kosla Marathi Movie : ज्ञानपीठ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' कादंबरीवर येणार सिनेमा!

२७ नोव्हेंबरला दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार घोषणा


मुंबई : भारतीय साहित्य (Indian Literature) क्षेत्रातील सर्वोच्च 'ज्ञानपीठ' (Jnanpith Award) पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या कोसला (Kosala) कादंबरीचे अनेक चाहते आहेत. पुण्यात शिक्षणासाठी एका छोट्याशा गावातून आलेल्या पांडुरंग सागवीकर या नायकाची द्विधा मनस्थिती दर्शवणारी ही कादंबरी. मनात सतत न्यूनगंड बाळगून असणाऱ्या लोकांसाठी ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड आहे.


भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत लिहिलेल्या या कादंबरीतून समाजाचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं. अनेक वर्षे लोटली तरीही मराठी साहित्यविश्वात कोसला कादंबरीची चर्चा होते. अशातच कोसला कादंबरीसंबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.


नेमाडेंच्या कोसला कादंबरीवर आता मराठी सिनेमा (Marathi Movie) येणार आहे. 'कोसला - उदाहरणार्थ मी' असं या सिनेमाचं नाव आहे. निर्माण स्टुडिओज आणि मेहूल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोघांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


२७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मुंबईत ही घोषणा होणार आहे. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, अच्युत पालव या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाची घोषणा होणार आहे. 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच सिनेमाची संपूर्ण टीम आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. नेमाडेंच्या लोकप्रिय कोसला कादंबरीवर सिनेमा येणार असल्याने पुस्तकप्रेमी आणि सिनेप्रेमी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन