Fungus disease : तुरीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत

रब्बी हंगामात करावा लागणार अवकाळीचा सामना


बुलढाणा : अनियमित पाऊस (Irregular Rain) आणि बदलते खराब हवामान (Bad weather) याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे निदान रब्बी हंगामात (Rabi Season) चांगली पिके होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खराब हवामानामुळे रब्बी हंगामातील तुरीच्या पिकावर 'फायटोप्थोरा ब्लाईट' (Phytophthora blight) या बुरशीजन्य रोगाचा (Fungus disease) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.


खरीप हंगामाच्या वेळी राज्यांत अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्याने खरीप पिके झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडीफार तुरीच्या पिकाची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे 'फायटोप्थोरा ब्लाईट' या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे.


राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. पण या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही याच रोगाने तुरीचं उत्पादन जवळपास ५० ते ६० टक्के घटलं होतं. त्यामुळे फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.



रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना


रब्बीच्या हंगामात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीशी (Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान

Bengaluru-Nagpur Flight : नागपुरातील मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम; इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर विमान रायपूरला वळवले

नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (७ मे) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी जनजीवन

Sanjay Shirsat Criticized Imtiaz Jaleel : “निदा खानला इम्तियाज जलील यांचा आश्रय”; मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील