Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी स्वतःला संपवण्याचे सत्र सुरुच

  75

तरुणाने घेतले स्वतःला जाळून; वाचवण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार शर्थीचे प्रयत्न करत असतानाही मराठा समाजाच्या (Maratha Samaj) तरुणांच्या आत्महत्येच्या घटना (Suicide cases) थांबायचं नाव घेत नाहीत. काल सकाळच्या सुमारास आणखी एक धक्कादायक घटना घडली. अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. त्याचा जीव वाचला असला तरी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील गंभीररित्या भाजली आहे. सध्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडेही जळाले. परंतु सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही, असे सांगण्यात आले. पाथरवाला बुद्रूक येथील बसस्थानक परिसरातील ते रहिवासी आहेत.


घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले की, सूरज गणेश जाधव असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे तर मंगल गणेश जाधव असे त्याच्या आईचे नाव आहे. सूरज हा ६० टक्के भाजला असून, मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या आहेत. दोघांवर घाटी रुग्णालयातील जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार सुरू आहेत.


प्रथम त्यांना उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असून गोंदी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या