Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी स्वतःला संपवण्याचे सत्र सुरुच

  71

तरुणाने घेतले स्वतःला जाळून; वाचवण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार शर्थीचे प्रयत्न करत असतानाही मराठा समाजाच्या (Maratha Samaj) तरुणांच्या आत्महत्येच्या घटना (Suicide cases) थांबायचं नाव घेत नाहीत. काल सकाळच्या सुमारास आणखी एक धक्कादायक घटना घडली. अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. त्याचा जीव वाचला असला तरी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील गंभीररित्या भाजली आहे. सध्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडेही जळाले. परंतु सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही, असे सांगण्यात आले. पाथरवाला बुद्रूक येथील बसस्थानक परिसरातील ते रहिवासी आहेत.


घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले की, सूरज गणेश जाधव असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे तर मंगल गणेश जाधव असे त्याच्या आईचे नाव आहे. सूरज हा ६० टक्के भाजला असून, मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या आहेत. दोघांवर घाटी रुग्णालयातील जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार सुरू आहेत.


प्रथम त्यांना उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असून गोंदी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली