Kirit Somaiya : मुलुंडचा मुंब्रा करण्याचा उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहल यांचा कट

भाजप आमदार किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप


मुंबई : भाजप आमदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुलुंडचा मुंब्रा बनवण्याचा कट हे दोघे मिळून रचत आहेत, असा हा आरोप आहे. मुलुंडमधल्या साडेसात हजार घरांच्या पीईपी घोटाळ्यासाठी हे दोघे जबाबदार आहेत, असं सोमय्या म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांनी मानखुर्द, गोवंडी, बेहराम पाडा या ठिकाणी जे विस्थापित असतील त्या सगळ्या मुस्लिमांना पीईपीमधून घरं देऊन मुलुंडचं सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नष्ट करण्याचा घाट घातल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. हा पीईपी घोटाळा आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळात वर्षभर ही बाब इकबाल चहल यांनी दडवून ठेवली होती. या जागेवर आधी कोव्हिड हॉस्पिटल उभं राहणार होतं. जेव्हा बांधकाम सुरु झालं तेव्हा आम्ही ही सगळी माहिती बाहेर काढली. त्यामुळेच मी हा विषय उचलला आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.


किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका यांची पहिली यादी आमच्या हातात आली. २७२ परिवारांना मुलुंड पूर्वमध्ये हलवण्यात येणार आहे. फिरोज अहमद, फिरोज शेख, फैजल हक, दुबेर सत्तार, फद्रू रहमान, जावेद सिद्दीकी अशी २७२ कुटुंबं स्थलांतरित केली जाणार आहेत. मालाडमधल्या नाल्याचं रुंदीकरण होत असल्याने तिथल्या ७२ कुटुंबाना स्थलांतरीत केलं जाणार आहे. फिरोझ नईम, मोहम्मद रिझवी, मोहम्मद हनीफ खान असे सगळे ७२ परिवार स्थलांतरित होणार आहेत.


पुढे ते म्हणाले, महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळेजण पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या कच्च्या झोपड्यांमधून आलेले लोक आहेत. मुंबई महापालिकेने ११९ फूट, ९३ फूट, ९५ फूट, ७८ फूट अशी यांच्या झोपड्यांची नोंद केली आहे. या लोकांना ३०० स्क्वेअरफूट कारपेट असलेली घरं दिली जाणार आहेत. ५४ लाखांचं घर आहे. अशी सात हजार कुटुंबं बेहराम पाडा, चेंबूर, बैंगनवाडी, मालाड या ठिकाणाहून वास्तव्यास येणार आहेत. त्यामुळे मुलुंडचं सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक महत्त्व कमी केलं जातं आहे.


मुलुंडचं मुंब्रा करण्याचं उद्धव ठाकरे आणि इकबाल चहल यांचं कटकारस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवावं अशी विनंती मी करतो आहे. मी टप्प्याटप्प्याने याविषयीच्या याद्या प्रसिद्ध करणार आहे. या लोकांमध्ये बांगलादेशी लोकही आहेत, असाही आरोप सोमय्यांनी केला.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,