Tulsi Vivah 2023 : यंदा तुळशी विवाह कधी? जाणून घ्या परंपरा, पद्धत आणि यंदाचा मुहूर्त...

हिंदू धर्मात (Hindu Religion) तुळशीला (Tulsi) विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात (Ayurveda) देखील तुळस अत्यंत गुणकारी मानली जाते. पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळस वाढवली जायची. तिच्यामुळे घरात रोगराई येण्यास प्रतिबंध व्हायचा. हल्ली धकाधकीच्या जीवनात दारासमोर तुळस वाढवणेही कठीण झाले आहे. मात्र, तुळशी विवाहाची परंपरा आपण जपली आहे. आजच्या लेखात यंदाच्या तुळशी विवाहाचा मुहूर्त (Tulsi Vivah 2023) आणि यामागील परंपरा आपण जाणून घेणार आहोत.



काय आहे परंपरा?


तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची परंपरा आहे. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.



कसा करतात तुळशी विवाह?


घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.



यंदा तुळशी विवाह कधी?


तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केला जातो. हा उत्सव वृंदावन, मथुरा आणि नाथद्वारा येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार यावेळी एकादशी २३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबरला द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०१ वाजता सुरू होईल. शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:०६ वाजता संपेल. उदयतिथीचा विचार करून तुळशीविवाह २४ नोव्हेंबरलाच साजरा केला जाणार आहे.

Comments
Add Comment

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर