ICC Cricket World Cup: आता चार वर्षे आणखी प्रतीक्षा, जाणून घ्या पुढील वर्ल्डकपबद्दल सर्व माहिती

  131

मुंबई: वर्ल्डकप २०२३चा सोहळा नुकताच संपला आहे. फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय चाहत्यांना वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी पुन्हा चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. वनडे क्रिकेटमध्ये पुढील वर्ल्डकप २०२७मध्ये होणार आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. तीनही देशांनी मिळून वर्ल्डकपचे यजमानपद सांभाळणार आहेत.


हे दुसऱ्या असेल जेव्हा आफ्रिकेच्या महाद्वीरमध्ये वर्ल्डकप खेळवला जाईल. याआधी वर्ल्डकप २००३चे आयोजन आफ्रिकेत झाले होते. तेव्हा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह केनियाने वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन केले होते. त्यावेळेस दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे ग्रुप स्टेजमधून बाहेर गेले होते. तर केनियाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. सेमीफायनलमध्ये केनियाला भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.


२० वर्ष आधी आफ्रिकेत झालेला हा वर्ल्डकप भारतासाठी अविस्मरणीय ठरला होता. १९८३नंतर टीम इंडिया पहिल्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. दरम्यान, तेव्हाही ऑस्ट्रेलियाच्या हातून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.


यजमान असल्याने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेला वर्ल्डकप २०२७मध्ये खेळता येणार आहे. मात्र नामिबियासोबत असे होणार नाही. त्यांना आपली पात्रता वर्ल्डकपसाठी सिद्ध करावी लागेल.



किती संघ घेणार भाग


पुढील वर्ल्डकपमध्ये १४ संघ सहभागी होतील. यातील दोन संघ ठरलेले आहेत. यानंतर निर्धारित वेळेपर्यंत आयसीसी वनडे रँकिंगमधील टॉप ८ संघांना सरळ वर्ल्डकपचे तिकीट मिळेल. बाकी चार संघ क्वालिफायर्सच्या माध्यमातून या स्पर्धेत जागा मिळवतील.


वर्ल्डकप २०२७मध्ये ७-७ संघ दोन ग्रुपमध्ये विभागले जातील. यातील राऊंड रॉबिन स्टेजनंतर दोन्ही ग्रुपमधील टॉप ३ संघ पुढील स्टेजमध्ये पोहोचतील. दुसऱ्या राऊंडमध्ये ६ संघ अतील. प्रत्येक ग्रुपमधील संघ दुसऱ्या ग्रुपच्या सर्व संघांसोबत एक एक सामना खेळतील. या पद्धतीने या राऊडमध्ये प्रत्येक संघ तीन तीन सामने खेळतील. या स्टेजमध्ये दोन संघ एलिमिनेट होतील आणि नंतर सेमीफायनलमध्ये सामना खेळवला जाईल.

Comments
Add Comment

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत