World Cup finale 2023 : भारताचं ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं तुटपुंजं आव्हान

आता जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर...


अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान हसतहसत स्विकारलेल्या भारताने नंतर मात्र संथ कामगिरी केली.


आतापर्यंत भारताने विश्वचषकातील दहाही सामने जिंकल्याने भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. मात्र, फलंदाजी पाहता आता गोलंदाज तरी आपली जादू दाखवतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं आव्हान उभं केलं आहे. आतापर्यंतच्या सामन्यांतील हे सर्वात कमी धावसंख्या असलेलं आव्हान आहे.


सुरुवातीलाच शुभमन गिल अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्माही ४७ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रेयसही चार धावांवर बाद झाला. विराट कोहलीने किमान अर्धशतक करत नाव राखले. तो ५४ धावांवर बाद झाला. केएल राहुलनेही ८५ चेंडूंमध्ये कसंबसं अर्धशतक पूर्ण केलं आणि ६६ धावांवर बाद झाला. सेमीफायनल गाजवलेला मोहम्मद शामी केवळ ६ धावांमध्ये आऊट झाला. तर जसप्रीत बुमराह अवघी एक धाव काढून आणि सूर्याकुमार यादव १८ धावांवर बाद झाला. त्यामुळे स्टोडिअममध्ये भारताचा जल्लोष दिसला नाही.


एका विकेटचा धक्का पचवत असतानाच दुसरी विकेट पडली, असं चित्र स्टेडिअमवर निर्माण झालं होतं. त्यामुळे वेळात वेळ काढून सामना पाहायला बसलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. यानंतर भारताच्या गोलंदाजांनी जर आपली जादू दाखवली तरच भारताकडून जिंकण्याच्या अपेक्षा ठेवता येऊ शकतात.

Comments
Add Comment

Jharkhand Road Accident News : रामगडमध्ये ट्रकची प्रवासी वाहनाला भीषण धडक; ७ जणांचा मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड (Ramgarh) जिल्ह्यातील रजरप्पा पोलीस ठाणे (Rajrappa Police Station) हद्दीतील लारी-बरलौंग परिसरात गुरुवारी

Mahesh Dixit Appointed IB Chief : महेश दीक्षित यांची आयबी (IB) प्रमुखपदी नियुक्ती; कोण आहेत हे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्त्वाची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau-IB) च्या

Amazon CEO Andy Jassy : ॲमेझॉनची भारतात २०३० पर्यंत ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; अँडी जेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर केली घोषणा

नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात २०२६ ते

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)