Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडिया आणि इंडिगोची दोन विमाने टॅक्सीवेवर एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि वैमानिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही विमाने वेळेत थांबवण्यात आली आणि संभाव्य अपघात टळला. (Ahmedabad Airport)


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अहमदाबादला आलेले एअर इंडियाचे एआय-२४९३ हे विमान लँडिंगनंतर पार्किंग बेकडे जात असताना अनवधानाने चुकीच्या दिशेने वळले. याचवेळी इंडिगोचे एक विमान उड्डाणासाठी टॅक्सीवेवर पुढे सरकत होते. परिणामी, दोन्ही विमाने एकाच मार्गावर समोरासमोर आली. घटनेची माहिती मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही विमानांना सुरक्षित अंतर राखून थांबण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कोणतीही धडक न होता परिस्थिती नियंत्रणात आली. (Ahmedabad Airport)


या घटनेबाबत एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, "२४ जून रोजी मुंबईहून अहमदाबादला आलेल्या एआय-२४९३ विमानाने लँडिंगनंतर टॅक्सींग करताना चुकून चुकीचे वळण घेतले होते. मात्र, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला नाही." (Ahmedabad Airport)



एअर इंडियाने पुढे सांगितले की, संबंधित विमान नंतर टोइंग वाहनाच्या मदतीने सुरक्षितपणे त्याच्या निर्धारित पार्किंग बेमध्ये नेण्यात आले. तसेच घटनेची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहितीही कंपनीने दिली. (Ahmedabad Airport)


दुसरीकडे इंडिगो एअरलाइननेही या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, "दोन्ही विमाने सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या विमानाला मार्ग मोकळा करून देण्यात आला आणि आमच्या विमानाने नियोजित उड्डाण पूर्ण करत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले."


इंडिगोने यासंदर्भातील माहिती तत्काळ संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. विमानवाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, टॅक्सीवेवरील अशा घटना दुर्मीळ असल्या तरी त्या गंभीर स्वरूपाच्या मानल्या जातात. कारण विमानांच्या हालचालींसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्गांवर अत्यंत अचूक समन्वय आवश्यक असतो. अशा परिस्थितीत एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ आणि वैमानिकांची सतर्कता महत्त्वाची ठरते. (Ahmedabad Airport)



दरम्यान, या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील हालचालींवर परिणाम झाला असला तरी कोणतीही जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नसल्याने प्रवासी आणि विमान कंपन्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून सविस्तर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. (Ahmedabad Airport)

Comments
Add Comment

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.