Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील मेट्रो अखेर उद्घाटनाशिवाय आजपासूनच सुरु होणार

जाणून घ्या कोणती स्थानके आणि कसे असणार तिकीट दर?


नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) सुरु होणारी मेट्रो (Metro) गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अखेर आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. प्रवासात ११ स्थानके असणार्‍या या मेट्रोचा मुख्यतः खारघर आणि तळोजामधील लोकांना फायदा होणार आहे. बेलापूर ते पेणघर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. आज दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल.



कोणती स्थानके असणार?


१. बेलापूर टर्मिनल
२. आरबीआय कॉलनी
३.बेलपाडा
४. उत्सव चौक
५.केंद्रीय विहार
६. खारघर गाव
७. सेंट्रल पार्क
८. पेठपाडा
९. अमनदूत
१०. पेठाली तळोजा
११. पेणघर
अशी ११ स्थानके या मेट्रो प्रवासात असणार आहेत.



कसे असणार तिकीट दर?


० - २ किमी : १० रुपये
२ - ४ किमी : १५ रुपये
४ - ६ किमी : २० रुपये
६ - ८ किमी : २५ रुपये
८ - १० किमी : ३० रुपये
१० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर : ४० रुपये


आज पहिली मेट्रो तीन वाजता धावणार असून उद्यापासून नियमितपणे सकाळी सहा ते रात्री दहा  या वेळेत मेट्रो धावणार आहे.
Comments
Add Comment

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी; दृतगती मार्गासह, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा खोळंबा

मुंबई : सलग सुट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवर शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह