Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील मेट्रो अखेर उद्घाटनाशिवाय आजपासूनच सुरु होणार

  238

जाणून घ्या कोणती स्थानके आणि कसे असणार तिकीट दर?


नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) सुरु होणारी मेट्रो (Metro) गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अखेर आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. प्रवासात ११ स्थानके असणार्‍या या मेट्रोचा मुख्यतः खारघर आणि तळोजामधील लोकांना फायदा होणार आहे. बेलापूर ते पेणघर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. आज दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल.



कोणती स्थानके असणार?


१. बेलापूर टर्मिनल
२. आरबीआय कॉलनी
३.बेलपाडा
४. उत्सव चौक
५.केंद्रीय विहार
६. खारघर गाव
७. सेंट्रल पार्क
८. पेठपाडा
९. अमनदूत
१०. पेठाली तळोजा
११. पेणघर
अशी ११ स्थानके या मेट्रो प्रवासात असणार आहेत.



कसे असणार तिकीट दर?


० - २ किमी : १० रुपये
२ - ४ किमी : १५ रुपये
४ - ६ किमी : २० रुपये
६ - ८ किमी : २५ रुपये
८ - १० किमी : ३० रुपये
१० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर : ४० रुपये


आज पहिली मेट्रो तीन वाजता धावणार असून उद्यापासून नियमितपणे सकाळी सहा ते रात्री दहा  या वेळेत मेट्रो धावणार आहे.
Comments
Add Comment

Kabutar Khana : "शस्त्र उचलणार असाल तर"...दादर कबुतरखाना प्रकरणात मराठी एकीकरण समितीचा आक्रमक पवित्रा

मुंबई : हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून मागील

गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा डबल धमाका

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत रेल्वेसेवा मुंबई :

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना वाद तापला; मराठी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई : दादर कबुतरखाना (Kabutar Khana Dadar) बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आज, १३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !

हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! - हिंदु जनजागृती

चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे

मुंबई महापालिकेच्या आता ‘संपर्क स्मार्ट शाळा’

१८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ मुंबई : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने