Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील मेट्रो अखेर उद्घाटनाशिवाय आजपासूनच सुरु होणार

जाणून घ्या कोणती स्थानके आणि कसे असणार तिकीट दर?


नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) सुरु होणारी मेट्रो (Metro) गेल्या सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अखेर आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. प्रवासात ११ स्थानके असणार्‍या या मेट्रोचा मुख्यतः खारघर आणि तळोजामधील लोकांना फायदा होणार आहे. बेलापूर ते पेणघर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. आज दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो धावणार आहे, तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल.



कोणती स्थानके असणार?


१. बेलापूर टर्मिनल
२. आरबीआय कॉलनी
३.बेलपाडा
४. उत्सव चौक
५.केंद्रीय विहार
६. खारघर गाव
७. सेंट्रल पार्क
८. पेठपाडा
९. अमनदूत
१०. पेठाली तळोजा
११. पेणघर
अशी ११ स्थानके या मेट्रो प्रवासात असणार आहेत.



कसे असणार तिकीट दर?


० - २ किमी : १० रुपये
२ - ४ किमी : १५ रुपये
४ - ६ किमी : २० रुपये
६ - ८ किमी : २५ रुपये
८ - १० किमी : ३० रुपये
१० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर : ४० रुपये


आज पहिली मेट्रो तीन वाजता धावणार असून उद्यापासून नियमितपणे सकाळी सहा ते रात्री दहा  या वेळेत मेट्रो धावणार आहे.
Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले