India vs Australia: तब्बल २० वर्षांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार फायनल मुकाबला

मुंबई: भारताच्या यजमानपदाखाली खेळवला जात असलेला आयसीसी विश्वचषक २०२३ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील संघ ठरले आहेत. हे संघ आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया. हे दोन्ही संघ २० वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये आमनेसामने असतील.


याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवण्यात आला होता.हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आला होता. यात भारतीय संघाला १२५ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीच्या हातात होते. कांगारूंचे नेतृत्व रिकी पॉटिंग करत होता.



१९ नोव्हेंबरला होणार फायनल


२० वर्षानंतर दोन्ही संघ बदलले आहेत. आता भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे तर कांगारूंचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सांभाळत आहेत. यावेळेस हा खिताबी सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.


२००३मध्ये गांगुलाच्या नेतृत्वात दादागिरी झाली होती. मात्र आता २० वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ खूप बदलले आहेत. यावेळेस भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ तगडी दिसत आहे. यावेळेस वर्ल्डकपमध्ये नव्या भारताची दादागिरी पाहायला मिळेल.


भारतीय संघाने आतापर्यंत आपले १०ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडला ७० धावांनी हरवत फायनल गाठली आहे. तर कांगारूच्या संघाने चोकर्स म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ३ विकेटनी हरवत फायनलमध्ये प्रवेश केला.


आता ऑस्ट्रेलियाचा संघ ८व्यांदा फायनलमध्ये खेळण्यास उतरणार आहे. त्यांनी आतापर्यंत ७ पैकी पाचवेळा खिताब जिंकला आहे. त्यांना दोन वेळा वेस्ट इंडिज आणि १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ वेळा १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५मध्ये खिताब जिंकला होता.


तर भारतीय संघाचा विश्वचषकातील चौथा खिताबी सामना आहे. या संघाने १९८३मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात पहिल्यांदा खिताब जिंकला होता. यानंर २००३मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला होता. मात्र २०११मध्ये भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्डकप पटकावला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला होता.

Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)