Nashik Diwali : पालावर राहणाऱ्या ऊस तोडणी कामगारांसोबत भाजप नेत्यांनी साजरी केली दिवाळी

  98

चलो जलाये दिप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा हैं l


नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांचा संवेदनशील उपक्रम


नाशिक : प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघा भारत दीपावलीचा (Diwali Festival) आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरणे पोहचलेली नाहीत. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव या तरुणाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजूनही अंधारात चाचपडणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली.


भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने पालावर रहाणाऱ्या ऊस तोडणी कामगार कुटुंबियांना दीपावली फराळ व त्यांच्या मुलांना फटाके देऊन तसेच त्यांच्या झोपडीच्या बाहेर पणत्या लावून दीपावली साजरी करण्यात आली.



पणतीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशातही ऊस तोड कामगार कुटुंबातील चिमुकल्या चेहऱ्यावर आनंदाच्या तर प्रशांत जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. ऊस तोडणी कामगार कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या भावना या उपक्रमाचे सार्थक निर्देशित करीत होत्या.


याप्रसंगी भाजप अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनिल केदार, नाना शिलेदार व ॲड. शाम बडोदे, चिटणीस अमित घुगे व तुषार जोशी, उपाध्यक्ष प्रथमेश काश्मिरे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सरचिटणीस प्रविण भाटे, उपाध्यक्ष संदिप शिरोळे, विनोद येवले, उमेश शिंदे, ऋषिकेश डापसे, आदित्य दोंदे, योगेश धात्रक, गोरख धात्रक, अमोल थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या