Nashik Diwali : पालावर राहणाऱ्या ऊस तोडणी कामगारांसोबत भाजप नेत्यांनी साजरी केली दिवाळी

चलो जलाये दिप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा हैं l


नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांचा संवेदनशील उपक्रम


नाशिक : प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघा भारत दीपावलीचा (Diwali Festival) आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरणे पोहचलेली नाहीत. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव या तरुणाच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजूनही अंधारात चाचपडणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली.


भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने पालावर रहाणाऱ्या ऊस तोडणी कामगार कुटुंबियांना दीपावली फराळ व त्यांच्या मुलांना फटाके देऊन तसेच त्यांच्या झोपडीच्या बाहेर पणत्या लावून दीपावली साजरी करण्यात आली.



पणतीच्या त्या मिणमिणत्या प्रकाशातही ऊस तोड कामगार कुटुंबातील चिमुकल्या चेहऱ्यावर आनंदाच्या तर प्रशांत जाधव यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. ऊस तोडणी कामगार कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या भावना या उपक्रमाचे सार्थक निर्देशित करीत होत्या.


याप्रसंगी भाजप अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनिल केदार, नाना शिलेदार व ॲड. शाम बडोदे, चिटणीस अमित घुगे व तुषार जोशी, उपाध्यक्ष प्रथमेश काश्मिरे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सरचिटणीस प्रविण भाटे, उपाध्यक्ष संदिप शिरोळे, विनोद येवले, उमेश शिंदे, ऋषिकेश डापसे, आदित्य दोंदे, योगेश धात्रक, गोरख धात्रक, अमोल थेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार