Palghar adiavsi : सिमेंटच्या जंगलात पालघरचे आदिवासी जपतायत बहुमोल संस्कृती आणि परंपरा

कशी करतात दिवाळीची तयारी?


मोखाडा : आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आदी ग्रामीण भागात आज ही पारंपरिक रिती रिवाज व पिढी जात परंपरांचे जतन केले जात आहे. आधुनिकतेच्या काळात सर्वत्र टोले जंग इमारती, आलिशान घरांना संगमरवरी, रंगी बेरंगी फरशी, मार्बल स्टाईलचे जंगल जगभर निर्माण झालेले असतानाही जव्हार, मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात आजही दिवाळी सण सुरू व्हायच्या अगोदर या भागातील महिला, नागरिक आपल्या घरात आणि घराबाहेरील मोकळे अंगण मुरुमाच्या साहाय्याने चोपून शेणामातीने सारवून घेतात.


आदिवासी भागातील रोजगार आणि उपजिविकेचे दुर्भिक्ष बघता कुटुंबांच्या दोनवेळच्या पुरेशा उदरनिर्वाहाची मारामारी असणाऱ्या बहुसंख्य आदिवासी कुटुंबांची घरे व घरासमोरील अंगणातील मोकळी जागा आज ही मुरुमाने चोपल्यानंतर शेणाने सारवली जाते. गावालगत असलेला मुरुम खड्डेदार चिकट माती आणल्यानंतर पूर्वीच्या मातीच्या भरावाचे वरवर खोदकाम करुन त्याच्यावर पुरेपूर पाणी टाकले जाते. एकदा का पूर्वीचा मुरुम चिंब भिजला की त्याच्यावरुन नवीन मुरुमांचा पसारा दिला जातो. यानंतर लाकडापासून बनविलेल्या दीड फूट लांब आणि तीन-चार इंच रुंद तसेच वरुन खाली उताराच्या स्वरुपाचे पिटणे चोपण्या च्या साहाय्याने ओला चिंब झालेल्या मुरुमावर जोराने चोप देऊन मुरुम बसविला जातो. असे तीन चार वेळा झाल्यानंतर त्यावरुन शेणाचे सारवण दिले जाते. पुन्हा एकदा दोन चार वेळा चोप देऊन घराचे अंगण किंवा घर मुरुमाने चकचकीत चोपडे बनवले जाते.

Comments
Add Comment

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना