मोखाडा : आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आदी ग्रामीण भागात आज ही पारंपरिक रिती रिवाज व पिढी जात परंपरांचे जतन केले जात आहे. आधुनिकतेच्या काळात सर्वत्र टोले जंग इमारती, आलिशान घरांना संगमरवरी, रंगी बेरंगी फरशी, मार्बल स्टाईलचे जंगल जगभर निर्माण झालेले असतानाही जव्हार, मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात आजही दिवाळी सण सुरू व्हायच्या अगोदर या भागातील महिला, नागरिक आपल्या घरात आणि घराबाहेरील मोकळे अंगण मुरुमाच्या साहाय्याने चोपून शेणामातीने सारवून घेतात.
आदिवासी भागातील रोजगार आणि उपजिविकेचे दुर्भिक्ष बघता कुटुंबांच्या दोनवेळच्या पुरेशा उदरनिर्वाहाची मारामारी असणाऱ्या बहुसंख्य आदिवासी कुटुंबांची घरे व घरासमोरील अंगणातील मोकळी जागा आज ही मुरुमाने चोपल्यानंतर शेणाने सारवली जाते. गावालगत असलेला मुरुम खड्डेदार चिकट माती आणल्यानंतर पूर्वीच्या मातीच्या भरावाचे वरवर खोदकाम करुन त्याच्यावर पुरेपूर पाणी टाकले जाते. एकदा का पूर्वीचा मुरुम चिंब भिजला की त्याच्यावरुन नवीन मुरुमांचा पसारा दिला जातो. यानंतर लाकडापासून बनविलेल्या दीड फूट लांब आणि तीन-चार इंच रुंद तसेच वरुन खाली उताराच्या स्वरुपाचे पिटणे चोपण्या च्या साहाय्याने ओला चिंब झालेल्या मुरुमावर जोराने चोप देऊन मुरुम बसविला जातो. असे तीन चार वेळा झाल्यानंतर त्यावरुन शेणाचे सारवण दिले जाते. पुन्हा एकदा दोन चार वेळा चोप देऊन घराचे अंगण किंवा घर मुरुमाने चकचकीत चोपडे बनवले जाते.
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…