Uttarakhand tunnel collapsed : उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत २४ तासांनंतरही बचावकार्य सुरुच

Share

३६ मजूर अजूनही अडकून…

उत्तराखंड : दिवाळीमध्ये (Diwali) सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मात्र एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशी (Uttarkashi) शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने (Tunnel collapsed) ३६ मजूर आतमध्ये अडकले आहेत. या घटनेला २४ तास उलटल्यानंतरही या मजूरांना बाहेर काढण्यात अद्याप यश आलेले नाही. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून या कामगारांसाठी पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. या कामगारांनी आपण सुरक्षित असल्याचे कळवले आहे. मात्र, २४ तासांहून अधिक काळ लोटल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. पोकळीतून पडणारा ढिगारा शॉर्ट क्रिएटिंग मशीन वापरून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, पण या प्रयत्नाला तितके यश येत नाही आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami) यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ”SDRF, NDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत.” त्यांनी स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधानांनीही फोनवरून घेतली माहिती

हिमाचल प्रदेश येथून परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उत्तरकाशीच्या बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांची स्थिती, मदत आणि बचावकार्य याबाबत फोनद्वारे सविस्तर माहिती घेतली. पंतप्रधानांनी यासंबंधी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. केंद्रीय एजन्सींना भारत सरकारने मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली.

Recent Posts

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

12 mins ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

1 hour ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

2 hours ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

4 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

4 hours ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

5 hours ago