Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर मोठा अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर सोमवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका वयस्कर महिलेसह तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीच्या वसंत विहार येथे राहणाऱे कुटंब दिल्ली येथून पुष्करला जात होते. या दरम्यान लक्ष्मणगढ ठाणे क्षेत्रात एक्सप्रेसवेवर ड्रायव्हरला डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने डिव्हायडरला धडक मारली.



दिल्ली-एक्सप्रेसवेवर झाला रस्ते अपघात


या घटनेबाबत एसएचओ श्रीरामन मीना यांनी सांगितले दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पुलिया नंबर १०७वर चंद्रा का बासजवळ एक कार खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मणगढ ठाणे पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.



रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू


दिल्लीत राहणारे निर्मला पाठक(वय ७० वर्षे), अरूण पाठक(४५ वर्षे) तसेच मुस्कान पाठक(वय २० वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर गौतम पाठक(१६ वर्षे) आणि हर्ष पाठक(२० वर्षे) यांची स्थिती गंभीर झाली आहे. यानंतर त्यांना राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



दिल्लीवरून पुष्करला जात होते कुटुंबीय


मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब सकाळी दिल्ली येथून ७ वाजता पुष्करला जात होते. गाडी अरूण पाठक नावाची व्यक्ती चालवत होती. यावेळी झोपेची डुलकी आली. यामुळे कारवरील ताबा सुटला आणि गाडी भिंत तोडून खाली पडली.

Comments
Add Comment

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : पोटात संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मंगळवारी