Accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर मोठा अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर सोमवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका वयस्कर महिलेसह तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीच्या वसंत विहार येथे राहणाऱे कुटंब दिल्ली येथून पुष्करला जात होते. या दरम्यान लक्ष्मणगढ ठाणे क्षेत्रात एक्सप्रेसवेवर ड्रायव्हरला डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने डिव्हायडरला धडक मारली.



दिल्ली-एक्सप्रेसवेवर झाला रस्ते अपघात


या घटनेबाबत एसएचओ श्रीरामन मीना यांनी सांगितले दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पुलिया नंबर १०७वर चंद्रा का बासजवळ एक कार खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मणगढ ठाणे पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.



रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू


दिल्लीत राहणारे निर्मला पाठक(वय ७० वर्षे), अरूण पाठक(४५ वर्षे) तसेच मुस्कान पाठक(वय २० वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर गौतम पाठक(१६ वर्षे) आणि हर्ष पाठक(२० वर्षे) यांची स्थिती गंभीर झाली आहे. यानंतर त्यांना राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



दिल्लीवरून पुष्करला जात होते कुटुंबीय


मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब सकाळी दिल्ली येथून ७ वाजता पुष्करला जात होते. गाडी अरूण पाठक नावाची व्यक्ती चालवत होती. यावेळी झोपेची डुलकी आली. यामुळे कारवरील ताबा सुटला आणि गाडी भिंत तोडून खाली पडली.

Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी