नवी दिल्ली: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर सोमवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका वयस्कर महिलेसह तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीच्या वसंत विहार येथे राहणाऱे कुटंब दिल्ली येथून पुष्करला जात होते. या दरम्यान लक्ष्मणगढ ठाणे क्षेत्रात एक्सप्रेसवेवर ड्रायव्हरला डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने डिव्हायडरला धडक मारली.
या घटनेबाबत एसएचओ श्रीरामन मीना यांनी सांगितले दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पुलिया नंबर १०७वर चंद्रा का बासजवळ एक कार खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मणगढ ठाणे पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.
दिल्लीत राहणारे निर्मला पाठक(वय ७० वर्षे), अरूण पाठक(४५ वर्षे) तसेच मुस्कान पाठक(वय २० वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर गौतम पाठक(१६ वर्षे) आणि हर्ष पाठक(२० वर्षे) यांची स्थिती गंभीर झाली आहे. यानंतर त्यांना राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब सकाळी दिल्ली येथून ७ वाजता पुष्करला जात होते. गाडी अरूण पाठक नावाची व्यक्ती चालवत होती. यावेळी झोपेची डुलकी आली. यामुळे कारवरील ताबा सुटला आणि गाडी भिंत तोडून खाली पडली.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…