Delhi Rain: दिल्ली-NCRमध्ये अचानक बदलले हवामान, पावसामुळे प्रदूषणाची पातळी घसरली

नवी दिल्ली: दिवाळी च्या आधी दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान बदलले आहे. दिल्ली, नोएडापासून गाझियाबाग आणि फरीदाबादपर्यंत हवामानात अचानक बदल पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर रात्रभर या ठिकाणी हलका पाऊसही झाला. दिल्ली-एनसीआरच्या काही भागात हलका पाऊस पाहायला मिळाला.


यामुळे राष्ट्रीय राजधानीत वाढत चाललेल्या प्रदुषणामुळे काही काळ दिलासा मिळाला आहे. कर्तव्य पथ आणि दिल्ली-नोएडा सीमेजवळील भागांमध्ये हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पाहायला मिळाला. संपूर्ण एनसीआरमध्येही पावसाने हजेरी लावल्याने वातावरण अतिशय स्वच्छ झाले आहे.


दिल्ली-एनसीआरमध्ये अशा वेळेला पाऊस झाला जेव्हा प्रदूषणाने या ठिकाणी धोक्याची पातळी गाठली होती. या ठिकाणी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून कृत्रिम पावसाची तयारी करण्यात आली होती. याबाबतचा निर्णय केजरीवाल सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र निसर्गानेच दिल्लीवर कृपा केली आणि पाऊस बरसला.


एएनआयने जाहीर केलेल्या व्हिडिओत दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीशिवाय नोएडा, गाझियाबाद, गुरूग्राम आणि फरिदाबाद या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळाला.



गुरूवारी काय होती दिल्लीची स्थिती?


दिल्लीत गुरूवारी वायूची गुणवत्ता पातळी अतिशय धोक्याची होती. दरम्यान वातावरण अनुकूल असल्याची शक्यता असल्याने दिवाळीआधी हवेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. २४ तासांतील हवेची गुणवत्ता पातळी दररोज संध्याकाळी ४ वाजता सादर केली जाते. गुरुवारी वायूची गुणवत्ता पातळी ४३७ होती, तर बुधवारी ही पातळी ४२६ होती.

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय