Bandra-Worli sea link accident : वरळी सीलिंकवर भाजप नेत्याला मारण्याचा प्रयत्न

भीषण अपघातात वेगवान कारने दिली ६ गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू तर ९ जण जखमी 


मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंकवर काल रात्री १० च्या सुमारास एक भीषण अपघात (Bandra-Worli sea link accident) घडला. टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत.

इनोव्हा (Innova) या वेगवान गाडीने टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडीज (Mercedes) गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली. इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. सध्या ड्रायव्हर जखमी असून त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचार झाल्यावर त्याची चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, वरळी सी लिंकवरील अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले भाजपा नेता जितेंद्र चौधरी (Jitendra Choudhary) यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी या कार चालकाने सी लिंकवर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा केला आहे. एका कार्यक्रमातून परतत असताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने आपल्या कारला टक्कर मारली होती. मी ज्या बाजूला बसलो होतो त्याच बाजूला कारने टक्कर मारली. परंतु, आपली कार समुद्रात पडण्यापासून वाचली, असा दावा त्यांनी केला.

यानंतर ही कार त्याच वेगाने टोल नाक्याच्या दिशेने गेली. टोल नाक्यावर गाड्या उभ्या असतील याचा त्याला अंदाज नसावा. यामुळे त्याने तेथील गाड्यांना टक्कर मारली. तो ड्रायव्हर पाकिस्तानी भाषेत बोलत होता, असा दावा चौधरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे या घटनेला नेमकं काय वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना

Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार मुंबई :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन

Mumbai Attack Threat : मुंबईवर ९ ते १८ ऑगस्टदरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका ? 'एक्स'वरील पोस्टने खळबळ

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून मुंबईसह देशावर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवणारी एक वादग्रस्त

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याचे ऑडिट!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; रोख रक्कम, सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तूंच्या नोंदींची तपासणी