Manoj Jarange : दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर दौरे

६ टप्प्यात असणार दौरा


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीकरता उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा समाजाने सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा कोणालाच विसर पडू नये, ती मागणी धगधगतच राहिली पाहिजे यासाठी मनोज जरांगे पुन्हा राज्यभर दौरे करायला उभे राहणार आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.


मराठा आरक्षणाचा हा तिसरा टप्पा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे.


मनोज जरांगे हे दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे.


१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा


१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी


१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड


१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड


१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी


२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण


२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,


२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर


२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.


कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे. हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली