Manoj Jarange : दिवाळीनंतर जरांगे पुन्हा मैदानात उतरणार; १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर दौरे

६ टप्प्यात असणार दौरा


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीकरता उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा समाजाने सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत मराठा आरक्षणाचा कोणालाच विसर पडू नये, ती मागणी धगधगतच राहिली पाहिजे यासाठी मनोज जरांगे पुन्हा राज्यभर दौरे करायला उभे राहणार आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.


मराठा आरक्षणाचा हा तिसरा टप्पा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे.


मनोज जरांगे हे दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. सोबतच १ डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे.


१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा


१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी


१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड


१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड


१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी


२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण


२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,


२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर


२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.


कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे. हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा