Sleeping Position: झोपण्याच्या सवयीवरून जाणून घ्या तुमच्या personality बद्दल

  372

मुंबई: प्रत्येक मनुष्य स्वभावाने वेगवेगळा असतो. अनेकदा काही गोष्टींवरून माणसाच्या पर्सनालिटीबद्दल जाणून घेते. तुमच्या झोपण्याच्या सवयीवरूनही तुम्ही कसे आहात हे समजते. अनेकांना वेगवेगळ्या स्थितीत झोपण्याची सवय आहे. काही जण पाठीवर झोपतात. तर काहींना पोटावर झोपण्याची सवय असते. अनेकांना कुशीवर झोपण्याची सवय असते.



पाठीवर झोपणारे लोक


जर एखादी व्यक्ती पाठीवर झोपत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती जीवनात फोकस्ड आहे. केवळ इतकंच नव्हे तर शांत आणि मजबूतही आहे. अशी व्यक्ती वादांपासून दूर राहते आणि नेहमी खरे बोलते. असे लोक खूप आशावादी असतात आणि जीवन खुलेपणाने जगतात. त्यांना नेहमी केंद्रस्थानी राहायला आवडते.



पोटावर झोपणारे लोक


अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. याचा अर्थ त्यांची इच्छाशक्ती प्रचंड मजबूत असते. या व्यक्ती आपल्या बोलण्यात अतिशय स्पष्ट असतात. मात्र यांचे बोलणे कटूही असू शकते. हे लोक आतल्या आत चिंता आणि समस्येचा सामना करतात. पोटावर झोपणारे लोक रागीटही असू शकतात.



कुशीवर झोपणारे लोक


एखादी व्यक्ती जर कुशीवर झोपत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती खूपच सोपी आणि सामाजिक व्यक्ती आहे. अशा व्यक्ती कोणाशी बोलण्यात कचरत नाही. या लोकांना विश्वासू म्हटले जाते. भलेही या व्यक्तींना पाहिल्यावर असे वाटेल की यांना कोणीही फसवू शकतं मात्र तसे नसते. त्यांना परिस्थितीची जाण असते. हे लोक निर्णय घेण्याच्या बाबतीत सुस्त असतात. तसेच अतिशय दयाळूही असतात.
Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.