सिडकोच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत लागली लॉटरी, ५० हजार रूपयांचा बोनस जाहीर

मुंबई: सिडकोच्या कर्मचाऱ्यांना(cidco employee) यंदा दिवाळीत मोठी लॉटरीच लागली आहे. यंदा सिडकोने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ५० हजार रूपये बोनसची घोषणा केली आहे.त्यामुळे सिडको कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. बोनसची घोषणा होताच या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत तसेच मिठाई वाटत आनंद साजरा केला.


इतर महामंडळांच्या तुलनेत यंदा सिडको महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनस जाहीर केला आहे. महामंडळाच्या या निर्णयाने कर्मचारी प्रचंड खुश झाले आहेत. त्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घोषित केलेल्या बोनसची रक्कम दिवाळीच्या आधी सर्व कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याऱची माहिती यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दिली.



कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस जाहीर


कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनसची घोषणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या बोनसच्या रकमेत वाढ करण्यात आलीआहे. या कर्मचाऱ्यांना यंदा १८ हजार ५०० रूपये बोनस दिला जाणार आहे.



ठाणे पालिकेकडूनही बोनसची घोषणा


ठाणे महानगरपालिकेकडूनही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी या कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० रूपये बोनस दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात