Buldhana Hospital news : गर्भपिशवीला टाके घालण्याऐवजी महिलेला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या

  111

महिलेचं मातृत्व हिरावणार्‍या जिल्हा प्रशासन रुग्णालयाचा ओंगळ कारभार


बुलढाणा : रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा भयानक प्रकार समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात घडली आहे. एक गर्भवती महिला (Pregnant Woman) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली असता तिला चुकून गर्भपाताच्या गोळ्या (Abortion pills) देण्यात आल्या. यामुळे त्या महिलेचे मातृत्व हिरावले गेले आहे. ही अत्यंत खळबळजनक घटना असून महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.


संबंधित महिला सौ. विद्या वाघ या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या. आपल्या नेहमीच्या चेकअपसाठी त्या बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या गर्भपिशवीचे मुख काही प्रमाणात उघडे असल्याचे सांगितले. जर ते तसंच राहिलं तर बाळाला धोका निर्माण होऊन नैसर्गिक गर्भपात होऊ शकतो, त्यामुळे गर्भपिशवीला टाके घालण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. सल्ल्यानुसार त्या बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात गेल्या. मात्र, या ठिकाणी अचानक बाळाला धोका निर्माण होऊन ते दगावले.


या घटनेमुळे महिला व नातेवाईकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तिथे असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मात्र याबाबत डॉ.सुभाष चव्हाण यांनी माध्यमांना ही मोठी चूक असून या प्रकरणाची चौकशी करून प्रतिक्रिया देऊ असं सांगितलं आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या