ST Bus Tickets : एसटीची दणक्यात दिवाळी तर प्रवाशांचे निघणार दिवाळे!

तिकीट दरात झाली वाढ...


मुंबई : राज्यभरात सर्वांनाच किफायतशीर असणारा वाहतुकीचा पर्याय म्हणजे एसटी (ST Bus). पण दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने (Maharashtra State Road Transpot Corporation) आपल्या तिकीट दरात (Ticket rates) १० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सामान्य माणसाच्या खिशाला आणखी एक कात्री लागणार आहे. मंगळवार, ७ नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असून २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांत महागाई खूपच वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांसोबत भाज्या, कपडे यांचेही दर वधारले आहेत. त्यानंतर आता एसटीचेही भाडे वाढल्याने सामान्य माणसाच्या चिंतेत भर पडली आहे. एसटीची ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी करण्यात आली आहे. दरवाढीतून अश्वमेध व शिवनेरीला वगळण्यात आले असून, या बसला पूर्वीचेच दर राहणार आहेत.


नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ तर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी साध्या बससह शिवशाहीला देखील ५० ते १०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.


दरम्यान, एसटी महामंडळाने घालून दिलेल्या नियमांनुसार खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) कंपन्यांनीही दीडपट भाडेवाढ केली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यांची दिवाळीही दणक्यात साजरी होणार आहे. परंतु खासगी बसच्या तुलनेत एसटी बसची तिकीट दरवाढ कमी आहे. शिवाय महिलांना पन्नास टक्के सूट तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास याही एसटीच्या सुविधा कायम राहणार आहेत.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती