पंतप्रधान मोदींनी ८० कोटी गरीबांना दिली दिवाळी भेट

पुढील पाच वर्षे मिळणार मोफत रेशन


दिवाळीचा सण काही दिवसांवर आला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळीची मोठी भेट दिली आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे आता देशातील ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळणार आहे. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीबांना सरकारकडून रेशन दिले जाते. दिवाळीचा सण आठवडाभरावर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील गरीब जनतेला दिलासा मिळाला आहे.

छत्तीसगडमधील दुर्ग येथे पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोफत रेशन योजनेला पाच वर्षे मुदतवाढ देण्याची घोषणा केली. या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये ९० जागांच्या विधानसभेसाठी ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.


‘कोरोना’नंतर सुरु केली योजना
कोरोना महामारीनंतर केंद्र सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ सुरू केली होती. कोरोना महामारीनंतर लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विशेषत: गरिबांना खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गरीबांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरु केली होती. त्या योजनेचा ८० कोटी देशवासी लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.


डिसेंबरमध्ये योजना संपुष्टात येणार होती
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळते. केंद्र सरकारने सर्वप्रथम ३० जून २०२० रोजी याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ही योजना डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात संपणार होती. आता ५ वर्षांच्या मुदतवाढीनंतर, लोकांना डिसेंबर २०२८ पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.


नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबद्दल म्हणाले की, भाजप सरकारने आता देशातील ८० कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना आणखी ५ वर्षे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देत आहेत’.

Comments
Add Comment

Israel - Iran War : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची इराण-इस्रायली समकक्षांशी फोनवरून चर्चा

-परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कतारच्या पंतप्रधानांशीही फोनवरुन संवाद - पश्चिम आशिया प्रदेशातील

Israel - Iran War : अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर काश्मीरमधील लाल चौकात निदर्शने

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत तीव्र संताप

LPG Price: एलपीजी सिलिंडर महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन किमती

मुंबई: देशातील सर्व तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमती २८

Israel - Iran War : युद्धाचा हवाई वाहतुकीवर परिणाम; मुंबई विमानतळासह देशभरातील तब्बल ४४४ उड्डाणे रद्द

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री सोनल चौहान अडकली दुबईत; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

मुंबई: अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला असून मोठा युद्धाचा वणवा पेटला आहे. तिन्ही देशांमध्ये

Israel - Iran War : भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या अडकली दुबई विमानतळावर

भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू शनिवारी (२८ फेब्रुवारी)