Jyoti Waghmare : संजय राऊत, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या; त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?

  331

शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची खोचक टीका


मुंबई : संजय राऊत, (Sanjay Raut) सुप्रिया सुळे, (Supriya Sule) रोहित पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या (Matchbox) आहेत. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का? अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी त्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला. त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आणि पोलिसांना जनतेची गैरसोय करू नका आणि रस्ता खुला करा असे सांगितले. पण तरीही विश्वप्रवक्त्यांनी विष ओकले. रोज सकाळी विष ओकण्याचे काम संजय राऊतानी थांबवलेले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समर्पित भावनेने काम करतात. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते. अनेक लोक त्यांच्यावरती आग ओकण्याचे काम करतात आणि त्या आगी मध्ये तेल ओतण्याचे काम दररोज सकाळी संजय राऊत करतात, असा हल्लाबोल वाघमारे यांनी केला.


संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार महाराष्ट्रातल्या काडीपेट्या आहेत. त्यांना जाती-जातीत तेढ निर्माण करून महाराष्ट्र पेटवायचा आहे का?? त्यांच्यामुळे जर महाराष्ट्र पेटला तर त्याची संपूर्णतः जबाबदारी त्यांचीच राहील. त्यांनी लक्षात ठेवावे जगात सगळ्या गोष्टीची किंमत वाढली पण काडीपेटीची किंमत वाढली नाही. ती अजूनही फक्त एक रुपयाच आहे. त्यामुळे आग लावण्याचे काम थांबवा, अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना फटकारले.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये