Jyoti Waghmare : संजय राऊत, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या; त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?

शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची खोचक टीका


मुंबई : संजय राऊत, (Sanjay Raut) सुप्रिया सुळे, (Supriya Sule) रोहित पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या (Matchbox) आहेत. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का? अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी त्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला. त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आणि पोलिसांना जनतेची गैरसोय करू नका आणि रस्ता खुला करा असे सांगितले. पण तरीही विश्वप्रवक्त्यांनी विष ओकले. रोज सकाळी विष ओकण्याचे काम संजय राऊतानी थांबवलेले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समर्पित भावनेने काम करतात. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते. अनेक लोक त्यांच्यावरती आग ओकण्याचे काम करतात आणि त्या आगी मध्ये तेल ओतण्याचे काम दररोज सकाळी संजय राऊत करतात, असा हल्लाबोल वाघमारे यांनी केला.


संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार महाराष्ट्रातल्या काडीपेट्या आहेत. त्यांना जाती-जातीत तेढ निर्माण करून महाराष्ट्र पेटवायचा आहे का?? त्यांच्यामुळे जर महाराष्ट्र पेटला तर त्याची संपूर्णतः जबाबदारी त्यांचीच राहील. त्यांनी लक्षात ठेवावे जगात सगळ्या गोष्टीची किंमत वाढली पण काडीपेटीची किंमत वाढली नाही. ती अजूनही फक्त एक रुपयाच आहे. त्यामुळे आग लावण्याचे काम थांबवा, अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना फटकारले.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल