Jyoti Waghmare : संजय राऊत, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या; त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का?

शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची खोचक टीका


मुंबई : संजय राऊत, (Sanjay Raut) सुप्रिया सुळे, (Supriya Sule) रोहित पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्रातल्या काडीपेट्या (Matchbox) आहेत. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का? अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी विरोधकांना चपराक लगावली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी त्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला. त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आणि पोलिसांना जनतेची गैरसोय करू नका आणि रस्ता खुला करा असे सांगितले. पण तरीही विश्वप्रवक्त्यांनी विष ओकले. रोज सकाळी विष ओकण्याचे काम संजय राऊतानी थांबवलेले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समर्पित भावनेने काम करतात. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते. अनेक लोक त्यांच्यावरती आग ओकण्याचे काम करतात आणि त्या आगी मध्ये तेल ओतण्याचे काम दररोज सकाळी संजय राऊत करतात, असा हल्लाबोल वाघमारे यांनी केला.


संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार महाराष्ट्रातल्या काडीपेट्या आहेत. त्यांना जाती-जातीत तेढ निर्माण करून महाराष्ट्र पेटवायचा आहे का?? त्यांच्यामुळे जर महाराष्ट्र पेटला तर त्याची संपूर्णतः जबाबदारी त्यांचीच राहील. त्यांनी लक्षात ठेवावे जगात सगळ्या गोष्टीची किंमत वाढली पण काडीपेटीची किंमत वाढली नाही. ती अजूनही फक्त एक रुपयाच आहे. त्यामुळे आग लावण्याचे काम थांबवा, अशी खोचक टीका करत शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना फटकारले.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५